Thursday 24 October 2013

कुशल , प्रशिक्षित बांधकाम अभियंते बनविणे !






















जी व्यक्ती कसे शिकायचे व बदलायचे हे शिकते तिलाच ख-या अर्थाने शिक्षित म्हणता येईल... कार्ल रॉजर्स

कार्ल रॅनसम रॉजर्स हा एक अतिशय प्रभावी अमेरिकी मानसतज्ञ होता व मानवीय मानसशास्त्र या शाखेच्या संस्थापकांपैकी एक होता. अशा महान व्यक्तिंविषयी मला अतिशय आदर वाटतो कारण अतिशय सोप्या शब्दात ते अतिशय किचकट विषयही सोपा करुन सांगतात. वर दिलेल्या अवतरणात कार्ल यांनी आपल्या जीवनात शिक्षण आणि त्याची नेमकी भूमिका विषद करुन सांगितली आहे! अलिकडेच मी जेव्हा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाची पुनर्रचना करणा-या किंवा तो ठरविणा-या चमूचा एक भाग होतो तेव्हा मला शिक्षण व शिकणे याविषयीचे हे शब्द आठवले. बरेच जण नेहमीप्रमाणे विचार करतील की याचा आपल्या मुख्य विषयाशी म्हणजेच रियल इस्टेट किंवा बांधकाम उद्योगाशी काय संबंध आहे. त्यासाठी आपल्याला बांधकाम उद्योगाची सध्याची स्थिती पाहावी लागेल.

बांधकाम उद्योग हा देशातील सर्वाधिक रोजगार निर्मिती करणा-या उद्योगांपैकी एक आहे व आपल्यासारख्या विकसनशील देशांमध्ये हाच उद्योग मूलभूत पायाभूत सुविधांचीही निर्मिती करतो. घर बांधणी असो, रस्ते बांधणी असो, धरणे किंवा कारखाने बांधायचे असोत आपल्याला त्यासाठी प्रचंड मनुष्य व यांत्रिक बळ लागते, त्याशिवाय या माणसांवर व यंत्रांवर देखरेख करण्यासाठी आपल्याला प्रशिक्षित व तांत्रिकदृष्ट्या कुशल लोक लागतात. मात्र या आघाडीवर चित्र कसे आहे? एकीकडे हजारो अभियांत्रिकी तसेच तंत्रनिकेतन महाविद्यालये आहेत ज्यांच्या जागा पूर्ण भरल्या जात नाहीत व दुसरीकडे बांधकाम व्यवसायाला सतत तांत्रिकृष्ट्या प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता जाणवते!

आता शिक्षण हा देखील एक व्यवसायच झाला आहे, आणि या क्षेत्राने बांधकाम व्यवसायाच्या गरजा काय आहेत हे जाणून घेणे व त्यानुसार आपले उत्पादन म्हणजेच कुशल प्रशिक्षित अभियंते तयार करणे आवश्यक आहे! मी सहभागी झालो होतो त्या बैठकीत बांधकाम क्षेत्रातील तसेच शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती होत्या व बांधकाम उद्योगाला खरोखर उपयोगी पडतील असे व्यावसायिक तयार करण्यासाठी अभ्यासक्रमात नेमके कोणते बदल करणे आवश्यक आहे हा चर्चेचा मुख्य विषय होता. महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेला कोणताही अभियंता कितीही हुशार असला तरीही त्याला बांधकामाच्या ठिकाणच्या सर्व तांत्रिक बाबी माहिती असतील अशी अपेक्षा कुणीच करत नाही. कारण प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणचा अनुभव तिथेच घ्यावा लागतो, मात्र तांत्रिकदृष्ट्या प्रशिक्षित व्यक्ती असल्यास त्याला बांधकामाच्या ठिकाणी काम शिकण्यासाठी कमीत कमी वेळ लागेल. बांधकाम व्यवसायाच्या तरुण अभियंत्यांकडून असलेल्या अपेक्षा आणि हे अभियंते करत असलेले काम यातील दरी दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे लोक नवोदितांना ठेवायला फारसे उत्सुक नसतात; शिक्षण क्षेत्रासाठी हे फारसे चांगले लक्षण नाही! जर कुणीच नवोदितांना घेणार नसेल तर त्यांना अनुभव कसा मिळेल? अनुभव हा वर्षांमध्ये मोजता येत नाही, तर तुम्ही जे शिकता व त्यातून तुम्ही अधिक चांगला परिणाम साध्य करता त्याला अनुभव म्हणतात! माझ्यासाठी अनुभव म्हणजे बदल स्वीकारणे व आपले काम अधिक चांगल्याप्रकारे करण्यासाठी त्याचा उपयोग करणे, ज्याचा आपल्या उत्पादनास फायदा होईल!

म्हणूनच याठिकाणी स्थापत्य अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाची रचना करण्यामध्ये किंवा त्यातील विषय ठरविण्यामध्ये बांधकाम उद्योगातील व्यावसायिकांची भूमिका महत्वाची आहे.
उद्योगातील तज्ञांनी महाविद्यालयातून नुकतेच शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या तरुणांच्या दृष्टीकोनाविषयी चिंता व्यक्त केली, कारण नव्या संकल्पना स्वीकारण्याची त्यांची तयारी नसते तसेच हातातील काम किंवा त्यांना देण्यात आलेली जबाबदारी पूर्ण करताना ते स्वतःचे डोके वापरत नाहीत. सध्याचे बहुतेक स्थापत्य अभियंते यंत्रमानवासारखे वागतात म्हणजे त्यांना मिळालेल्या आदेशाचे विश्लेषण न करता केवळ त्याचे पालन करतात. मी आधीच उल्लेख केल्याप्रमाणे, बांधकाम उद्योगाला अजूनही काँक्रिटीकरण, प्लास्टरीकरण, टाईल्स बसविणे व इतर अशा बांधकामाच्या ठिकाणावरील ब-याच कामांसाठी प्रचंड मनुष्यबळ लागते. या सर्व कामांचा दर्जा राखण्यासाठी त्यांच्यावर मानवी देखरेख अतिशय महत्वाची आहे व इथे पर्यवेक्षकाची किंवा आपण ज्याला अभियंता म्हणतो त्याची भूमिका महत्वाची आहे, कारण तिथे त्याला बांधकाम ठिकाणाच्या परिस्थितीशी जुळवून घेऊन, स्वतःचे कौशल्य वापरावे लागते. याला मिळालेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करणे म्हणतात, यामध्येच तरुण पिढी अतिशय कमी पडते व इथे समस्या त्यांच्या दृष्टीकोनाची आहे, पदवीची किंवा ज्ञानाची नाही.

दुसरी एक मोठी समस्या म्हणजे संवाद कौशल्ये, केवळ तांत्रिकदृष्ट्या प्रशिक्षित असल्याने तुम्ही यशस्वी अभियंता होत नाही, चांगले काम करण्यासाठी तुमच्याकडे केवळ तुमच्या वरिष्ठांनाच नाही तर तुमच्यासोबत काम करणा-या चमूलाही समजावून सांगण्याची हातोटी हवी. प्रत्येकाने संवाद साधण्यासाठी नेहमी तयार असायला हवे व त्याला किंवा तिला आपल्या कल्पना समजावून सांगण्यासाठी तार्किक बैठक हवी व त्याबद्दल आत्मविश्वास हवा. केवळ तांत्रिकदृष्ट्या अचूक असून उपयोग नाही तुम्हाला तुमच्या क्षमतांविषयी लोकांना पटवून देता आले नाही तर तुम्ही लवकरच निराश होण्याची शक्यता असते. या घटकाविषयीही चर्चा करण्यात आली व इतर अभियंत्यांशी संवाद साधण्याचा दृष्टीकोन विकसित व्हायला हवा असा विचार मांडण्यात आला.


नवोदित अभियंत्यांची अजून एक समस्या म्हणजे ज्ञानाचा तर्कशुद्ध वापर. इथे ब-याच जणांच्या हे लक्षात येत नाही की इमारतीचे, रस्त्याचे किंवा एखाद्या प्रकल्पाचे बांधकाम असो, जिथे माणसे किंवा यंत्रे काम करत असतात तिथे अनेक बाबी अनपेक्षितपणे घडतात. उदाहरणार्थ काँक्रिटीकरण सुरु असते तेव्हा अचानक पावसाला सुरुवात होते; अशावेळी तिथे देखरेख करणा-या अभियंत्याने तर्कशुद्ध विचार करुन परिस्थितीला योग्य प्रतिसाद देणे आवश्यक असते व अशावेळी केवळ पुस्तकी गोष्टींचा उपयोग होत नाही. कोणत्याही व्यक्तिची सामान्य प्रतिक्रिया काम थांबवणे ही असेल, मात्र पावसासाठी तयार असणे व दर्जाशी तडजोड न करता पावसातही काम सुरु ठेवणे हे अभियंत्यांकडून अपेक्षित आहे! पुस्तकांमध्ये जे शिकले आहे ते नक्कीच महत्वाचे आहे, मात्र प्रत्यक्ष काम करताना ते जसेच्या तसे वापरता येत नाही. इथे खरे तर तुम्ही जे शिकला आहात त्यावर विचार करणे व ते परिस्थितीच्या गरजेनुसार वापरणे हे महत्वाचे आहे! दुर्दैवाने नवोदित पिढी तर्कशुद्ध विचार करण्यात कमी पडते. इथे कुठेतरी गुणांवर आधारित शिक्षण पद्धती यास जबाबदार आहे यावर सर्वांचे एकमत झाले. याचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांना केवळ उत्तरे पाठ करण्याची व प्रश्न विचारल्यानंतर ती देण्याची सवय असते व त्या उत्तरांमागील तार्किक विचार ते आत्मसात करत नाहीत.


त्यानंतर मुद्दा येतो तो नेतृत्व गुणांचा, अभियंत्यांमध्ये तांत्रिक ज्ञानासह हे गुणही विकसित करणे आवश्यक आहे. अभियंता हा बांधकामाच्या ठिकाणाचा बॉस असतो, त्याने त्याचे स्थान समजावून घेणे आवश्यक आहे व ते त्याच्या वर्तनातून जाणवले पाहिजे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनापासूनच यासाठी प्रशिक्षित करणे आवश्यक आहे कारण एखाद्या ठिकाणाचा प्रभारी असणे हे केवळ एक पद नाही, ती जीवनशैली आहे जी व्यक्तिला स्वीकारावी लागते व त्या पदासोबत येणा-या जबाबदा-या समजून घेणे आवश्यक असते!

सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे हातात असलेल्या कामाबाबत प्रामाणिकपणा व एकनिष्ठा हवी; मात्र आजकाल अभियंत्यांमध्ये न कळवता सुट्ट्या घेणे किंवा थोड्याशा पगारवाढीसाठी नोकरी बदलणे असा कल दिसून येतो. यामुळे कामाचे नुकसान होते तसेच एखाद्या चमूचा प्रभारीच नोकरी सोडून गेल्यास संपूर्ण चमूचे धैर्य खचते. चांगल्या भवितव्याची आशा मनात बाळगण्यात गैर काहीच नाही मात्र त्याचवेळी हातात असलेल्या कामाविषयीची आपली जबाबदारी समजून घेणे तितकेच महत्वाचे आहे. अधिक चांगले भवितव्य म्हणजे केवळ अधिक चांगला पगार नाही; विविध काम करण्याची संधी तसेच जबाबदारी यातून ते घडू शकते. तरुण पिढीला शिक्षण घेतानाच हे समजावणे आवश्यक आहे . एक चांगला अभियंता एक चांगली व्यक्तिदेखील असला पाहिजे “, जो केवळ त्याच्या कामाचीच नाही तर त्याच्या आजूबाजूला असलेल्या लोकांचीही जबाबदारी घेईल!

देशातील बांधकाम उद्योगाला चांगले अभियंते हवे आहेत व ते एका दिवसात जन्माला येत नाहीत, अनुभवी अभियंते घडविण्यासाठी तरुणांवर अतिशय मेहनत घ्यावी लागते. यासाठी उद्योगातील लोकांनी आपल्या अनुभवाचे योगदान शिक्षण क्षेत्राला देणे आवश्यक आहे जे दुर्दैवाने होताना दिसत नाही. शैक्षणिक संस्था ज्या बांधकाम उद्योगासाठी अभियंते घडवित आहेत त्यातील नव्या संकल्पना मोकळेपणे स्वीकारल्या पाहिजेत व उद्योगाची नाडी जाणून घ्यायला हवी. विशेषतः रियल इस्टेट क्षेत्राला कुशल लोक नेतृत्व करण्यासाठीही हवे आहेत केवळ पर्यवेक्षक म्हणून नव्हे. खरी गरज आहे ती उद्योजक घडविण्याची कारण तेच देशातील लाखो गरजूंसाठी घरे बांधणार आहेत. ते चांगले अभियंते असतील तर ते प्रत्येक वेळी चांगलेच बांधकाम करतील, अधिकाधिक लोक या उद्योगात यावेत व त्यांनी त्यांच्या बांधकामाची जबाबदारी घ्यावी यापेक्षा रियल इस्टेट उद्योगाला अधिक काय हवे!


https://mail.google.com/mail/u/0/images/cleardot.gif
संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स



Sunday 13 October 2013

वैशाली, रुपाली आपल्या सामाजिक वारसा असणाऱ्या जागा








मला भटकंती करायला आणि शहरात काय आहे हे पहायला आवडते                              …एस्टेला वॉरेन

एस्टेला वॉरेन ही एक कॅनडीयन अभिनेत्री, माजी फॅशन मॉडेल आणि माजी आंतरराष्ट्रीय सिंक्रोनाइज्ड जलतरणपटूही आहे, व्यवसायाच्या निमित्ताने तिने जगभरात प्रवास केला आहे! प्रवास करणे ही नैसर्गिक मानवी प्रेरणा आहे त्यामुळे ती लाखो लोकांच्या मनातले बोलली आहे. माणसाला नेहमी नवी ठिकाणे पाहायची उत्सुकता असते व अनेक गोष्टींच्या शोधात विविध ठिकाणी जावेसे वाटते. काही जण केवळ करायचा म्हणून प्रवास करतात, काही जण नवीन ज्ञान मिळविण्यासाठी करतात, काही पैसा मिळवण्यासाठी करतात व काही स्वतःचा शोध घेण्यासाठी प्रवास करतात! कारणे कोणतीही असली तरी माणूस हा प्रवासी आहे व त्याच्या उत्साहातूनच नव्या नव्या शहरांचा शोध लागतो.

नेहमी असे म्हणतात की एखादे शहर त्यातील माणसांनी व तिथल्या ठिकाणांनी ओळखले जाते! स्वाभाविकपणे आपण एखाद्या शहराचा विचार करतो तेव्हा आपल्या मनात पहिल्यांदा विचार येतो तो तिथल्या माणसांचा व तिथल्या प्रसिद्ध ठिकाणांचा! कारण कोणत्याही शहराची प्रतिमा किंबहुना चेहरा ही माणसे किंवा ठिकाणे ठरवत असतात. उदाहरण द्यायचे झाले तर लंडनची माणसे बाहेरील कुणाशीही खडूसपणे वागतात, तिथल्या एखाद्या ठिकाणाचा विचार करायचा झाला तर आपण हाईड पार्कचा विचार करतो. आपण जेव्हा न्यूयॉर्कचा विचार करतो तेव्हा इतरांकडे दुर्लक्ष करण्याचा अमेरिकी गर्विष्टपणा आठवतो, टाईम स्क्वेअर आणि तिथली मौजमजा आठवते. पॅरिसचा विचार केल्यावर फ्रेंच लोकांचा निवांतपणा व आयफेल टॉवर आठवतो. आपल्या महान देशाबद्दल बोलायचे झाले तर दिल्लीचा विचार केल्यावर तर रस्त्यावरची मुजोर भाषा, पालिका बजार किंवा जामा मस्जिद आठवते. चेन्नई असेल तर रजनीकांत, लुंगी, इडली सांबार आठवतो, कोलकाता असेल तर बंगाली मिठाई आणि हावडा ब्रिज आठवतो! आता वर उल्लेख केलेल्या शहरांऐवढे पुणे मोठे नाही, मात्र पुणेकर जगभरात पोहोचले आहेत. तसेच आयटी उद्योग असो, ऑटोमोबाईल उद्योग असो किंवा शैक्षणिक सुविधा असोत या सर्व क्षेत्रांमध्ये पुण्याने जागतिक नकाशावर आपले स्थान निर्माण केले आहे. तर मग आपण पुण्याचा विचार करतो तेव्हा आपल्याला काय आठवते? सगळ्यात आधी आठवतो तो पुणेरी बाणा जो ब्रिटीशांपेक्षा तसूभरही कमी नाही, अमेरिकी लोकांप्रमाणेआम्ही सर्व जाणतो ही गुर्मी आणि त्यावर विनोदाची पखरण, चितळे बंधूंनी ग्राहकाचा कसा अपमान केला याचे किस्से, ऐतिहासिक शनिवारवाडा आणि वैशाली-रुपाली आवर्जुन आठवतात!

पुणेकर असण्यासाठी हा शेवटचा निकष मला बुचकळ्यात पाडतो, कारण शनिवारवाडा ही ऐतिहासिक वास्तू आहे, चितळे बंधू मिठाईवाल्यांचा स्वभाव पुणेरी माणसाचा स्वभाव दर्शवतो, पण मग वैशाली-रुपालीमध्ये असे काय आहे की तो पुण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे? जगन्नाथ शेट्टी हे दाक्षिणात्य नाव पुण्याचा वारसा कसे झाले? पुण्याच्या या वारशाबद्दल अनेक विनोद व किस्से प्रसिद्ध आहेत. ज्या मूठभर लोकांना वैशाली-रुपाली काय आहे हे माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो, ही काही जुळ्या बहिणींची नावे नाहीत, तर पुण्याच्या मध्यवर्ती भागातील फर्ग्युसन रस्त्यावरील दाक्षिणात्य पदार्थांची उपहारगृहे आहेत. मात्र अस्सल पुणेकरांसाठी ही स्मारके आहेत व त्यांच्या शहराच्या वारशाचा अविभाज्य भाग आहेत, या दोन्ही उपहारगृहांचे त्यांच्या जीवनातील महत्व अनन्यसाधारण आहे! असे म्हणतात की पुणेकर केवळ दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे वैशाली-रुपालीत जाणारे व दुसरे म्हणजे तेथे न जाणारे ! पुण्याच्या एकूणच प्रतिमेत वैशाली-रुपाली, जगन्नाथ शेट्टी व त्यांच्या चमूचे महत्व किंवा त्यांची लोकप्रियता किती आहे हे समजावून सांगण्यासाठी हा किस्सा पुरेसा आहे.

साधारणतः १९५० साली उघडण्यात आलेली ही उपहारगृहे आज तेव्हा किशोरवयीन असलेल्यांच्या तिस-या पिढीला सेवा देत आहेत, ही पिढी आज आजोबा-आजी झाली आहे व आजही आपल्या नातवंडांसोबत इथल्या चवीचा आणि वातावरणाचा आनंद घेते! असे म्हणतात की लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात मात्र या दोन्ही उपहारगृहांनी विशेषतः वैशालीने अनेकांसाठी त्यातल्या स्वर्गाची भूमिका बजावली आहे व आजही हा परिपाठ सुरु आहे! कॉलेजमध्ये जाणा-या अनेक तरुण-तरुणींनी आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत पहिला चहा किंवा कॉफी वैशालीतच प्यायली आहे व इथल्या वेटरनी कित्येकांच्या जोड्या जुळविण्यास मदत केली आहे. आपल्या खास मित्राला किंवा मैत्रिणीला लाजत-बुजत पहिल्यांदा घेऊन येणा-यांचे व त्यानंतर तेच लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर आल्यावर इथल्या वेटरनी त्यांचे वर्षानुवर्षे स्वागत केले आहे! पुण्यातले बरेचसे प्रसिद्ध नागरिक सांगतात की ते जेव्हा काही कामाच्या निमित्ताने किंवा सुटीसाठी बाहेरगावी जातात, तेव्हा परत आल्यानंतर आपल्या घरी जाण्याआधी पहिले काम म्हणजे वैशालीला भेट देणे आणि एक कप चहा पिणे! मी स्वतःदेखील माझ्या कॉलेजच्या दिवसांपासून म्हणजे २५ वर्षांपासून वैशालीचा करिश्मा अनुभवलाय; इथेही वैशाली आणि रुपालीचे चाहते असे दोन गट आहेत, आणि अशाप्रकारे विभागले जाण्यासाठी त्यांची आपापली कारणे आहेत. काहीजणांना रुपालीचा सांबार आणि कॉफी जास्त आवडते तर काही जणांना वैशालीचा चहा आणि तिथले वातावरण अधिक भावते. माझ्याविषयी बोलायचे झाले तर मी वैशालीकर आहे, मात्र दोन्ही जागांना असलेले वलय मला आवडते व एखाद्या निवांत रविवारी रुपालीच्या सांबाराच्या चवीचाही आस्वाद घेतो! मी कॉलेजमध्ये असताना घरुन मोजकेच पैसे मिळायचे, त्यामुळे वैशालीत जाणे ही चैन होती, जी मला काही महिन्यांतून एखादेवेळीच परवडायची. मात्र तेव्हा या दोन्ही ठिकाणी जाण्यात जी मजा होती ती आजही कायम आहे, आज मी तिथे रोज जाऊ शकत असलो तरीही.

ज्या शहराला त्याची संस्कृती व समाजजीवनाचा अभिमान वाटतो त्यात अशी ठिकाणे असणे आवश्यक आहे, किंबहुना ती आपल्या समाजाचा कणा आहेत. कारण अशी ठिकाणे नसतील तर लोक कुठे एकत्र येतील? इथल्या टेबलांवर एक नजर टाकली आणि जमलेल्या टोळक्यांच्या चर्चा ऐकल्या तर पुणे सांस्कृतिक राजधानी का आहे हे समजेल, हा उत्साहाने सळसळत्या वातावरणाचा एक भाग आहे! इथे एकीकडे जोडप्यांच्या प्रेमळ गुजगोष्टी सुरु असतात, तर दुसरीकडे जागतिक अर्थकारणावर चर्चा झडत असतात, इथे कोणत्याही विषयाला मनाई नाही, तुम्हाला इथे विविध क्षेत्रातली ख्यातनाम, उच्चपदस्थ मंडळी अशा चर्चांमध्ये आपली बाजू मांडताना दिसतील! मग त्यामध्ये कल्याणी, भोसले, पवार, बजाज आणि अगदी ठाकरेही असू शकतात! शहरातील उच्च पदस्थ अधिकारी, व्यावसायिक, राजकीय तसेच सामाजिक नेते, स्वयंसेवी संस्थांचे चालक सर्वजण वैशाली-रुपालीचा एक भाग आहेत व आपल्या उपस्थितीने या ठिकाणाच्या प्रसिद्धीचे वलय आणखी दैदिप्यमान करतात! अनेक गट दिवसाची सुरुवात वैशालीने करतात व त्यांची ठरलेल्या वेळी टेबल ठरलेली असतात. केवळ भेटीगाठींसाठीच नाही तर व्यावसायिक बैठकींसाठीही हे ब-याच जणांचे आवडते ठिकाण आहे. आता एखाद्याला प्रश्न पडेल की एवढी वर्दळ असताना व्यावसायिक बोलणी कशी करता येईल, मात्र ती होते हे खरे आहे.

एखाद्याला वाटेल की त्यात काय एवढेसे, भारतात प्रत्येकालाच प्रत्येक गोष्टीविषयी आपले मत व्यक्त करायला आवडते, त्यामुळे त्यांच्यासाठी अशा जागा सगळीकडेच असतात, तर वैशाली-रुपालीचे वैशिष्ट्य काय? ब-याच जणांना हा प्रश्न पडत असेल, मात्र मला वाटते की कोणत्याही जागेचा लौकिक एका दिवसात तयार होत नाही. जवळपास सहा दशके ही उपहारगृहे केवळ दाक्षिणात्य पदार्थच देत नाहीत तर लोकांना एकत्र येण्यासाठी व गप्पागोष्टी करण्यासाठी एक जागाही देतात. या ठिकाणच्या प्रत्येक गोष्टीत सातत्य आहे, तेच याचे वैशिष्ट्यही आहे! याचे सगळे श्रेय जाते जे त्यांचे कर्तेधर्ते जगन्नाथ शेट्टी यांना. त्यांनी काही हॉवर्ड विद्यापीठातून पदवी घेतलेली नाही किंवा जगभरात आपल्या उपहारगृहांची साखळी तयार करण्याची त्यांची महत्वाकांक्षा नाही. केवळ या दोनच उपहारगृहांवर ते खुश व समाधानी आहेत, पूर्ण समर्पणाने त्यांचे व्यवस्थापन करतात. या समर्पणातूनच सेवेत सातत्य राखता येते व तेच वैशाली-रुपालीच्या यशाचे गमक आहे! इथे जे पदार्थ मिळतात ते देणारी व इथल्यापेक्षाही चांगला दर्जा असलेली उपहारगृहे या शहरात असतीलही कदाचित. मात्र इथे केवळ तुम्हाला इडली, डोसा, सांबार मिळत नाही तर इथे तुम्ही एका संस्कृतीचा भाग बनता, व इथे भेट देणा-या प्रत्येक व्यक्तिला हे जाणवते. स्वच्छता, तत्पर सेवा, पदार्थांची चव कायम राखणे, इथे सर्व काही चोख आहे, जगन्नाथ शेट्टी यांनी जातीने लक्ष घालून केवळ उपहारगृहे उभारलेली नाहीत तर एक यंत्रणा विकसित केली आहे, इथले कर्मचारी त्याचा एक भाग आहेत. इथले स्वैपाकी असोत किंवा सफाई कामगार, प्रत्येक जण आपापल्या कामात मग्न असल्याचे तुम्हाला दिसून येईल. कोणत्याही माध्यमात एकही जाहिरात न देता वैशाली-रुपाली यशस्वी करण्यामागचे रहस्य जाणून घेण्यासाठी शेट्टींना अनेक संस्थांनी आमंत्रित केले. माझे त्यांच्याशी घरोब्याचे संबंध आहेत हे माझे भाग्य आहे. असेच एकदा निवांतपणे बोलताना त्यांनी सांगितले होते की, त्यांना कुणीतरी प्रश्न विचारला की वैशालीमध्ये एकही कामगार संघटना कशी नाही? त्यांनी उत्तर दिले, कोण म्हणते आमच्याकडे कामगार संघटना नाही? संघटना आहे व मीच त्या संघटनेचा नेता आहे! पट्टीचा व्यवस्थापन गुरुही असे उत्तर देऊ शकला नसता, कारण हे केवळ विद्वत्तापूर्ण उत्तर नाही तर सत्य आहे! ते त्यांच्या कामगारांची कुटुंबाप्रमाणे काळजी घेतात, मग मुलांचे शिक्षण असो किंवा त्यांचे औषधपाणी, सर्वकाही आधीच पूर्ण झाल्याने त्यांना मागण्या कराव्याच लागत नाहीत! त्यांनी मला एकदा सांगितले होते की कप बश्या इत्यादी साधनांचे नुकसान झाले तरीही ते व्यवस्थापक किंवा वेटरचे पैसे कापत नाहीत, व त्यांनी सर्व कर्मचा-यांना सांगितले आहे की ग्राहकांशी कधीही हुज्जत घालू नका, ते जे सांगतील ते हसून मान्य करा! तुम्ही वैशालीमध्ये याचा अनुभव घेऊ शकता, याची छोटीशी परीक्षा पाहायची असेल तर मसाला डोसा मागवा व तो आल्यानंतर मी साधा डोसा मागवला होता असे वेटरला सांगा! दुस-या कोणत्याही हॉटेलमध्ये तो मसाला डोसा परत घ्यायला नकार देईल, मात्र वैशालीत नाही; वेटर तुमच्याकडे पाहून नम्रपणे हसेल, मसाला डोसा घेऊन जाईल व साधा डोसा आणून देईल! वैशाली-रुपालीचा हा पैलू मी आवर्जुन इथे नमूद केला आहे कारण, आपण एखाद्या यंत्रणेचे यश पाहतो, मात्र त्या यशाच्या कारणांचे क्वचितच विश्लेषण करतो व मान्य करतो, त्यामुळे त्यातून काही शिकणे किंवा स्वीकारणे हे तर दूरच!
अलिकडेच जगन्नाथ शेट्टी यांना ऐंशी वर्षे पूर्ण झाली म्हणून वैशालीत एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व शहरातील सगळी दिग्गज मंडळी त्याला हजर होती. अनेकांच्या या ठिकाणाविषयीच्या आठवणी वृत्तपत्रात छापून आल्या होत्या. एखादे ठिकाण शहराला यापेक्षा अधिक काय देऊ शकते? मी नेहमी विचार करतो की एखाद्या ठिकाणाचे यश नेमके कशात असते. पैसे कमावण्यात, किंवा दुस-या लोकांनी त्याची नक्कल करण्यात किंवा तिथे किती माणसे येतात यामध्ये असते? एखादे ठिकाण काय मिळवू शकते? मला असे वाटते की वैशाली-रुपालीचे जे सध्या स्थान आहे त्यातच याचे उत्तर आहे. ही दोन्ही ठिकाणे एखाद्या जिवंत पात्राप्रमाणे आहेत, लोक त्यांना एक जिवंत व्यक्तिमत्व म्हणून ओळखतात, त्यांच्या यशाची याशिवाय दुसरी व्याख्या काय होऊ शकते!
सध्याच्या मॅकडोनल्ड व केएफसीच्या जमान्यात, जगभरातल्या चवी, उत्तम वातावरण असलेल्या उपहारगृहांशी स्पर्धा असताना, वैशाली-रुपाली दिमाखात उभ्या आहेत व त्यांनी स्वतःची ओळख (ब्रँड) तयार केलीय! पुणेकरांसाठी वैशाली, रुपाली केवळ उपहारगृहे नाहीत जिथे ते जेवू शकतात व लोकांना भेटू शकतात, तर या दोन्ही ठिकाणांना भेट देणे म्हणजे एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला भेटण्यासारखे आहे, ज्यांच्यासोबत ते काही जिव्हाळ्याचे क्षण निवांतपणे घालवू शकतात! आपल्याकडे अशी ठिकाणे आहेत हे आपले भाग्य आहे, त्यांचे जतन करणे व त्यांना अजरामर करणे ही समाजाची जबाबदारी आहे, तरच अशी ठिकाणे आपल्याजवळ असण्यासाठी आपण लायक होऊ! या शहराला आपल्या हक्काचे वैशाली आणि रुपाली देणा-या जगन्नाथ शेट्टी व त्यांच्या चमूसाठी तोच मानाचा मुजरा होईल!

संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स



Wednesday 2 October 2013

वीज आणि रिअल इस्टेट
























आत्मा काय असतो? तो वीजेसारखा असतो- तो नक्की काय असतो ते आपल्याला माहित नसते, पण ही शक्ती खोली प्रकाशित करू शकते – रे चार्ल्स

रे चार्ल्स रॉबिन्सन अमेरिकी गायक-गीतकार, संगीतकार होता आणि; तो आत्मिक संगीतप्रकाराचा निर्माता होता आणि त्याच्या विचारांवरूनच कळते तो एक चांगला विचारवंतही होता! आणि बांधकाम व्यवसायामध्ये अनेक विकासकांना या इतक्या महत्त्वाच्या घटकाबद्दल, वीजेबद्दल त्याचे मत पटत  नक्कीच असेल! त्यात त्यांचाही काही दोष नाही कारण अनेक अनुभवी स्थापत्य अभियंत्यांना  सुद्धा विद्दुतशास्त्राविषयी फारशी माहिती नसते, याचे कारण दुहेरी असू शकते, एकतर हा शैक्षणिक अभ्यासक्रमाचा विषय नसतो आणि दुसरे म्हणजे सध्याच्या वेगवेगळ्या भागात काम करण्याच्या पद्धतीमुळे, बहुतांश स्थापत्य अभियंते कामाच्या ठिकाणी विदयुतविषयक कामे हि त्यांच्या कामाचा भाग आहे, असे मानतच नाहीत.

दीर्घ काळापासून आपल्या देशाने जगण्याच्या तीन मुख्य गरजा असल्याचे स्वीकारले आहे आणि त्या आहेत, रोटी, कपडा और मकान म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा; या तीन गोष्टी आपल्या सुसंस्कृत जगण्याचे तीन निकष मानले जातात, त्याशिवाय आयुष्य पूर्ण होऊच शकत नाही! अलिकडे या निकषांमध्ये आणखी एका गोष्टीची भर घालण्याची गरज निर्माण झाली आहे आणि ती म्हणजे वीज! विचार करा, एखाद्याकडे तिन्ही गोष्टी आहेत, म्हणजे रोटी, कपडा आणि मकान पण वीज नाही आणि आपण कल्पना करू शकतो की या चौथ्या निकषाशिवाय आयुष्य किती खडतर होऊन जाईल!  दुर्दैवाने बांधकाम व्यवसाय आणि सरकार, ज्यांनी पायाभूत सुविधा निर्माण करून दिल्या पाहिजेत, त्यांनी नेहमीच या महत्त्वाच्या निकषाकडे दुर्लक्ष केले आहे अन्यथा आज आपण या विषयावर चर्चा केली नसती. आजूबाजूला पहा आणि तुम्हाला दिसेल की विशेषतः गावांमध्ये आणि खेड्यांमध्ये बहुतांश विनोद हे एमएसईबीवर, आपल्या सरकारी विद्युतपुरवठा संस्थेवर केलेले असतात. मंडे टू संडे इलेक्ट्रीसिटी बंद असा फुलफॉर्म करण्यापासून या विद्युतपुरवठा सेवेवर अनेक विनोद केलेले आढळून येतील. विनोद बाजूला सोडला तरी अशा विनोदांना मिळणारी लोकप्रियता सर्वसामान्यांचे आयुष्य विजेवर किती अवलंबून आहे, हेच दर्शवते.
विशेषतः शहरी जीवनात आपण विजेवर खूप अवलंबून असतो, नपेक्षा तिचे गुलाम असतो. आपले मोबाईल चार्ज करण्यासाठीही आपल्याला विजेची गरज भासते. बांधकाम व्यवसाय वाढत आहे कारण वाढत्या लोकसंख्येला घरांची गरज आहे, आणि या घरांना विजेची गरज आहे ही वस्तुस्थिती आहे. आपल्याकडे विद्युत पुरवठ्याची कमतरता आहे आणि उपलब्ध असलेला प्रत्येक युनिट नेमकपणाने आणि काळजीपूर्वक वापरावे  लागतो. विजेचा विषय असतो, तेव्हा दोन पैलूंकडे लक्ष द्यावे लागते आणि ते म्हणजे सुरक्षा आणि बचत! सामान्य माणसाला विजेबाबत फारसे काही कळत नाही, त्यामुळे साहजिकच तिचा वापर करताना अपघात होण्याची शक्यता असते आणि आपला अपघातांचा इतिहास असे सांगतो की त्यापैकी बहुसंख्य जीवघेणे असतात. तुम्ही आगींच्या इतिहासाचा अभ्यास केला तर व्यावसायिक किंवा रहिवासी इमारतींना आग लागण्यामागे मुख्य कारण हे इलेक्ट्रीक वायरिंग वाईट दर्जाचे असल्याचे दिसते आणि त्यामुळे शॉर्ट सर्किट होते आणि लक्षात घ्या वीज ही फार निर्दयी गोष्ट आहे असते! वायरिंग चुकीचे किंवा सदोष असेल तर तिथे दयामाया नसते आणि आपण तारा आणि बटणांसारख्या प्राथमिक गोष्टींमध्ये बचत करण्याचा प्रयत्न केला तर आपण त्याच्या कैकपट गमावू शकतो. तरीही अनेक विकासक निव्वळ दुर्लक्षापोटी बांधकामामध्ये इलेक्ट्रिकल सामानाच्या दर्जामध्ये तडजोड करतात ही वस्तुस्थिती आहे.

नपेक्षा तुम्ही बांधकाम व्यवसायातला कल पाहिला, तर काही अपवाद वगळता, बहुतांश बिल्डर्स विजेशी संबंधित संपूर्ण काम आउटसोर्स करतात, त्यामुळे त्यांचे या कामाच्या दर्जावर काही नियंत्रण राहत नाही. त्यांना असे वाटते की, आउटसोर्स केल्यामुळे वायरिंगच्या कामाच्या जबाबदारीपासून मुक्ती मिळते पण हा चांगला मार्ग नाही. तुम्ही आउटसोर्स केले तरी विद्युतकामाचे विशेष तपशील आणि डिझाईन याबद्दल तुम्ही आग्रही असले पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही तांत्रिकदृष्ट्या पात्र नसला तर उत्तम उपाय म्हणजे तुमच्या प्रकारच्या प्रकल्पांचा अनुभव असलेला इलेक्ट्रिकल कन्सल्टन्ट नेमणे. बांधकाम व्यवसायाबद्दल आणखी एक दुर्दैवी बाब म्हणजे ते ज्ञानी क्वचितच ओळखतात, त्याचा आदर करणे तर दूरच राहिले! या परंपरेला जागूनच क्वचितच एखादा बिल्डर इलेक्ट्रिकल कन्सल्टन्टची नेमणूक करतो आणि बहुतांश जण इलेक्ट्रिक कंत्राटदाराच्या सल्ल्याने काम करतात, अनेकदा हा कंत्राटदारच तांत्रिकदृष्ट्या पात्र नसतो! हा कल बदलत आहे आणि अनेक मोठ्या प्रकल्पांसाठी विशेष इलेक्ट्रिकल कन्सल्टन्ट नेमले जातात, ते पात्र असतात आणि त्यानुसार संपूर्ण वायरिंगचे काम करतात. पण हे प्रमाण फार कमी आहे.
इलेक्ट्रिकल कन्सल्टन्ट केबल आणि वायरच्या आकारानुसार सुरक्षित डिझाईनच तयार करतात असे नाही तर ते विद्युतगळतीही रोखतात. कंत्राटदार तांत्रिकदृष्ट्या सक्षम नसला तर सदोष आकाराच्या केबल निवडू शकतो, भविष्यात होऊ शकणाऱ्या अपघातांचे ते एक मुख्य कारण असू शकते.  तसेच वायरिंगची आकृती, केबलचा मार्ग आणि वर्कमॅनशिपचे तपशीलही महत्त्वाचे असतात. तसेच सर्व वायरिंगसाठी स्वतंत्र इलेक्ट्रिकल लेआउट आखणे आवश्यक असते. यामुळे विद्युतकाम तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण होईल आणि बिल्डिंग कोणत्याही अपघातापासून सुरक्षित राहील. यामुळे विजेच्या वापरातही बचत होईल, कारण विशिष्ट जागेसाठी किती प्रकाश आवश्यक आहे याचा अभ्यास आवश्यक असतो आणि ते जागेचे उद्दिष्ट किंवा वापर यासारख्या विविध निकषांवर अवलंबून असतो. सारख्याच क्षेत्रफळासाठी व्यावसायिक इमारतींमध्ये प्रकाशाची वेगळी गरज असेल आणि रहिवासी इमारतींमध्ये वेगळी. कन्सल्टन्ट इमारतीच्या इलेक्ट्रिकल डिझाईनिंगचे असे सर्व पैलू लक्षात घेतो. आपल्या देशात ऊर्जा महाग आहे आणि ती नेमकेपणाने वापरली पाहिजे आणि त्यासाठी इलेक्ट्रिकल वायरिंगचे योग्य डिझाईनिंग आवश्यक आहे.
विजेच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे एमएसईडीसीएलबरोबर, म्हणजे एमएसईबीच्या अधिकाऱ्यांबरोबर संबंध ठेवणे, कारण राज्यात वीज या संस्थेमार्फतच मिळते. आज मंडळावर (एमएसईबीचे लोकप्रिय नाव) समाजाच्या सर्व घटकांना वीजपुरवठ्याच्या मोठ्या मागणीची पूर्तता करण्याचा खूप दबाव आहे. स्रोत मर्यादित आहेत आणि त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उभ्या करण्याचा खर्च प्रचंड मोठा आहे. यामुळे पुरवठा विरुद्ध मागणी या समीकरणावर फरक पडतो, विशेषतः पुण्यासारख्या शहरांमध्ये आणि तुम्हाला प्रतिमीटर विद्युत दर खर्चावरून अधिकारी आणि विकासकांदरम्यान संघर्ष होताना दिसेल! इथे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरची भूमिका महत्त्वाची असते कारण अनेक कन्सल्टन्ट एमएसईबीकडून लोड मंजूर करून घेण्याची जबाबदारी घेत नाहीत. सध्या कोणत्याही प्रकल्पासाठी लोड मंजुरीचे निश्चित नियम नाहीत, पण ते क्षेत्रफळाप्रमाणे वीजेच्या उपलब्धतेनुसार आणि त्या भागात उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांप्रमाणे बदलतात. बांधकाम उद्योगासाठी ही खचितच निरोगी स्थिती नाही. कारण, विद्युतपुरवठ्यासाठी येणाऱ्या खर्चाबाबत पारदर्शकता नसते आणि त्याचा अंतिम फटका फ्लॅटच्या मालकालाच बसतो, कारण त्यालाच सर्व खर्च पेलावा लागतो. इलेक्ट्रिकल कंत्राटदारांच्या संघटनेने पुढाकार घ्यावा आणि लोड मंजुरीच्या नियमांबाबत सौहार्दाने उपाय शोधण्यासाठी मंडळ व विकासकादरम्यान पूल बनावे. एखाद्या विशिष्ट भागात होऊ घातलेले प्रकल्प एकत्र येऊन त्या भागापुरता एमएसईबीचा पायाभूत सुविधांचा खर्च वाटून घेऊ शकतात आणि या ठिकाणी इलेक्ट्रिकल कंत्राटदार/कन्सल्टन्टची असोसिएशन महत्त्वाची भूमिका बजावू शकते. तसेच लोड कॅलक्युलेशनसंबंधी आणि ती कशी करतात यासंबंधी खूप जागृतीची गरज आहे कारण अनेक विकास कंत्राटदाराच्या सांगण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात आणि  ते सांगतील तसे करतात. या ठिकाणी कन्सल्टन्ट नक्की मदत करू शकतात कारण ते विद्युत कामाच्या दर्जावर देखरेखही ठेवू शकतात.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विद्युत कामासंबंधी स्थापत्य अभियंते किंवा साईट पर्यवेक्षकाचा दृष्टीकोन; असे दिसते की त्यांना विद्युतकामाबद्दल काहीही घेणेदेणे नसते. आतापर्यंतच्या शिक्षणामध्ये त्यांना वीजेसंबंधीचे फारसे ज्ञान मिळालेले नसते हे मान्य पण प्रत्येकाने चौकस असले पाहिजे आणि प्रश्न विचारले पाहिजे तरच त्या गोष्टीचे ज्ञान मिळेल! इथेही बऱ्याच प्रशिक्षणाची गरज असते आणि इलेक्ट्रिकल कंत्राटदार तसेच कन्सल्टन्ट एखादा प्रशिक्षण वर्ग घेऊ शकतात. अखेर साईटच्या प्रमुखालाच साईटवरच्या कामाला मान्यता देणारा अंतिम अधिकार असतो.
आणखी एक दुर्लक्षित बाब म्हणजे ऊर्जाबचत करणाऱ्या उपकरणांच्या आणि त्यासंबंधीच्या तंत्रज्ञानाच्या जागृतीचा अभाव, कारण ही काळाची गरज आहे. पण इथेही दोन्ही बाजू म्हणजे कंत्राटदार तसेच विकासक या दोघांनाही पुरेशी माहिती नसते आणि वीजेचा मुद्दा आला म्हणजे आपण अजूनही पारंपरिक पद्धती आणि उपकरणांचा वापर करतो. ऊर्जाबचत करणाऱ्या एलईडीसारख्या वस्तूंसाठी परिपूर्ण वायरिंग नेटवर्क डिझाईनची गरज असते अथवा देखभालीचा खर्च फार जास्त वाढतो. तसेच बॅटरीवर चालणारी वाहने हा भविष्यकाळ आहे त्यामुळे आपल्या इलेक्ट्रिकल योजना डिझाईन करताना आपल्याला अशी वाहने चार्ज करण्यासाठी लागणारा लोड, तसेच चार्जिंगची सुविधा यांचाही विचार करावा लागणार आहे. तसेच इमारत बांधून पूर्ण झाल्यानंतर अंतर्गत व बाह्य वायरिंगसाठी या सर्व योजनांची नोंद केली पाहिजे आणि रहिवाशांना दिली पाहिजे, म्हणजे कधी काही दुरुस्तीची वेळ आल्यास त्यांना समस्या येणार नाही. शेवटच्या वापरकर्त्यालाही या महत्त्वाच्या पैलूची माहिती असली पाहिजे आणि यासंबंधीचे विशिष्ट तपशील विकासकाला विचारून घेतले पाहिजेत, कारण ही बाब म्हणजे थेट इमारतीच्या सुरक्षेशी संबंधित आहे.
फक्त भरपूर इलेक्ट्रिक पॉइंट्स दिले म्हणजे आपण चांगले काम केले असे होत नाही, कारण उद्गारात म्हटल्याप्रमाणे त्याने फक्त खोल्या प्रकाशमान होतील पण आपल्याला या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांचे चेहरे आणि त्यांचे भविष्यही उजळवायचे आहे. तरच आपण म्हणू शकतो की, हो आम्हाला वीज ही संज्ञा कळली आहे!

संजय देशपांडे


संजीवनी डेव्हलपर्स