Friday 30 September 2016

शाऊट्स ऑफ सायलेंस !
























"मौन" धारण करणा-या व्यक्तीवर वादविवादात विजय मिळवणे अशक्य आहे जोश बिलिंग्ज.

जोश बिलिंग्ज हे १९व्या शतकातला अमेरिकी विनोदी लेखक व्हीलर शॉ याचं टोपण नाव होतं. ते अमेरिकेतील अतिशय लोकप्रिय विनोदी लेखक व व्याख्याता होते. मार्क ट्वेन नंतर १९व्या शतकात शॉ याच्याइतका लोकप्रिय विनोदी लेखक दुसरा नसावा. मला नेहमी असं वाटतं की ज्या व्यक्तित तुम्हाला हसवण्याची क्षमता असते तो तुम्हाला गंभीर विचारपण  करायला लावु शकतो. जोश बिलिंग्ज यांचे वरील शब्द वाचल्यानंतर माझा तर्क चुकीचा नाही हे जाणवतं. बिलिंग्ज यांचे साहित्य विनोदी असले तरी त्यांनी मौनाची व्याख्या किती चपखल केलीय हे पाहा.

या मौनाविषयी विचार करायचं कारण म्हणजे नुकतेच राज्यभर निघालेले मराठा मोर्चे, हे सगळे एका अर्थाने मूक मोर्चे होते. आजकाल असं अपवादानंच पाहायला मिळतं कारण जेवढा आवाज जास्त तेवढं तुमचं म्हणणं जास्त ऐकलं जातं असंच समीकरण झालंय! महाराष्ट्राबाहेरच्या लोकांना पार्श्वभूमी समजावी म्हणून सांगतो, मराठा ही हिंदू धर्मात आढळणाऱ्या अठरापगड जातींपैकी एक जात आहे. शिवाजी महाराजांच्या काळापासून ओळखले जाणारे हे क्षत्रिय राज्याच्या राजकारणाचा कणा आहेत. महाराष्ट्रात मराठा बहुसंख्य आहेत व प्रामुख्याने ते शेती तसेच राजकारणात आहेत, हे क्षत्रिय जरी असले तरी आता पूर्वीसारख्या लढाया होत नाहीत. परंतु ग्रामीण भागामध्ये गावचा कारभार बहुतांश वेळा मराठा कुटुंबाच्या हातात असतो, अर्थात त्यातल्या अनेकांची परिस्थिती शेतीतून मिळणारं तुटपुंजं उत्पन्न तसंच शिक्षणाच्या चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने फारशी चांगली नसते. आरक्षणाच्या बाबतीत ते खुल्या वर्गवारीत येतात, त्यामुळे त्यांना सरकारी नोकऱ्या सहजासहजी मिळत नाहीत. यामुळे मराठा समाजातल्या अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, किमान या समाजातल्या नेत्यांचं तरी असंच म्हणणं आहे, तसंच आकडेवारीही तसंच सांगते. त्यात आणखी भर म्हणजे अत्याचार प्रतिबंधक कायद्यामध्ये मागास वर्गातल्या किंवा जातीतल्या कुणालाही त्रास देणाऱ्या किंवा शिवीगाळ करणाऱ्या तथाकथित उच्च वर्गातल्या कुणाविरुद्धही कारवाई करण्याची तरतूद आहे. या कायद्याचा मराठा समाजाविरुद्धच जास्त गैरवापर होत असल्याचा मराठा जनसमुदायाचा समज आहे, आपल्या माध्यमांमधून तर असाच सूर आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समुदायातले सामान्य लोक वर्षानुवर्षे मूग गिळून गप्प होते राजकीय नेते जातीचं राजकारण करत राज्य करत होते, मात्र कुठेतरी हा लाव्हा आत खोलवर खदखदत होता व जनमनात एक अस्वस्थता होती! अचानक हा मराठा समुदाय एकजूट होऊ लागला व मूक मोर्चांमधून एकत्र आला. आपल्याला बोचणाऱ्या विषयांबाबतची चीड, नैराश्य किंवा अस्वस्थता व्यक्त करण्यासाठी यापेक्षा आणखी चांगला मार्ग कोणता असू शकतो? परभणीतल्या एका मोर्चानं याची सुरुवात झाली व हळूहळू मुक मोर्चाच हे लोण राज्यातल्या सर्व मोठ्या शहरांमध्ये पसरलं. कुणालाही वैयक्तिक आमंत्रण न देता लाखो लोक एकत्र येऊ लागले व आपल्या मागण्या मांडण्यासाठी शांतपणे चालू लागले, हे असं दृश्य अनेक वर्षांमध्ये कधीही पाहायला मिळालं नव्हतं! महात्मा गांधीची दांडी यात्राच जणू परत अनुभवल्यासारखं हे दृश्य होतं, मात्र इथे जमावाला रोखण्यासाठी पोलीस बळाची गरज नव्हती, कारण सुदैवाने आपल्याकडे अजूनतरी मुक्त लोकशाही आहे त्यामुळे कुणीही सार्वजनिक ठिकाणी निदर्शनं करू शकतं तसंच मोर्चा काढू शकतं. सुरुवातीला माध्यमांना तसंच नेत्यांना या मोर्चांना किती मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय हे जाणवलं नाही. मात्र प्रत्येक शहरात जसा याला अधिकाधिक पाठिंबा मिळू लागला तशी समाज माध्यमांवर याविषयी अधिक चर्चा होऊ लागली व या मोर्चांना होणारी गर्दीही वाढू लागली.

मी कुणी राजकीय विश्लेषक नाही व मी माझ्या लेखनातून कधीही राजकीय टिप्पणी करत नाही. मात्र हे राजकारण नाही; एका जातीचे किंवा समुदायाचे लाखो लोक एकत्र येताहेत व निदर्शनं करण्यासाठी शांतपणे अनेक मैल चालताहेत व पुन्हा शांतपणे परत जाताहेत की अशाप्रकारे लोक एकत्र आले होते याच्या काही खाणाखुणाही राहू नयेत. हे सुद्धा अशा समुदायाच्या बाबतीत घडतंय जो आक्रमकपणासाठी ओळखला जातो व त्यांना फक्त बळाची भाषा समजते असं म्हणतात. कुणीही या मोर्चाचे नेतृत्व करत नाही किंवा कुणीही राजकीय पक्ष याचं श्रेय घेत नाही, किंबहुना मोठ्या राजकीय नेत्यांना मागे राहण्यास भाग पाडलं जातंय व समाजातील सामान्य माणसं विशेषतः महिला या मोर्चांमध्ये आघाडीवर आहेत. हे सगळं पाहिल्यानंतर आपल्यासमोर काहीतरी विलक्षण घडतंय असं वाटत नाही का व म्हणूनच मला हा लेख लिहावासा वाटला; मी काही एका विशिष्ट जातीचा व्यक्ती आहे म्हणजेच ब्राह्मण आहे म्हणून हे लिहीत नाही. ब्राह्मणांचं आणि मराठ्यांचं पटत नाही असंच चित्र माध्यमांमधून रंगवलं जातं तसंच सर्वसामान्य माणुसपण तसाच विचार करतो. माझ्या सर्व जाती व धर्मातल्या मित्रांनो मला मोकळेपणानी सांगवसं वाटतं की मी ब्राह्मण आहे व मला त्याचा अभिमानही नाही किंवा लाजही वाटत नाही, कारण ब्राह्मण कुटुंबात जन्माला येणं हे माझ्या हातात नाही म्हणुनच त्यासाठी मला श्रेय घेण्याचं कारण नाही. आपण प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या कुटुंबात जन्म घेतो, म्हणूनच आपण जन्माने काय आहोत याचा फार उदोउदो करायची गरज नाही असं माझं वैयक्तिक मत आहे व माझ्या या मताशी माझे अनेक मराठा मित्रंही सहमत असतील याची मला खात्री वाटते. आपण कोण आहोत हे आपल्या आडनावावरून किंवा जातीवरून किंवा धर्मावरून ठरत नसतं तर आपण काय करतो यावरून ते ठरतं, माझा आवडता चित्रपट बॅटमॅन बिगिन्समधून मी हे माझं तत्वज्ञान घेतलंय. मात्र आपल्या देशात आपल्याला सर्वप्रथम आपल्या पोटजातीने, त्यानंतर जातीने व त्यानंतर धर्माने ओळखले जाते. खरं म्हणजे समाज माध्यमांवर तर फक्त १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला आपली ओळख भारतीय अशी असते हे कटू सत्य आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण सर्वप्रथम माणूस आहोत हे आपण पूर्णपणे विसरतो, खरतर जगाला आपली ओळख अशीच व्हायला पाहिजे.

आपलं बालवाडीत नाव घालतानाच आपल्यावर हा जातीचा शिक्का बसतो व तिथूनच सुरुवात होते, वर्षागणिक आपल्या डोक्यात व मनात ही जात व धर्म पक्का भिनवला जातो व आपल्याला जातीचा अभिमान असला पाहिजे किंवा काही प्रकरणांमध्ये लाज वाटली पाहिजे असं बिंबवलं जातं. मी आरक्षण किंवा अत्याचार प्रतिबंधक कायदा याविषयी टिप्पणी करण्यास कुणी अधिकारी व्यक्ती नाही. मात्र तुम्ही एखाद्या जातीला टिकून राहण्यासाठी काही सोयीसुविधा देणार असाल तर इतर जातीही त्या मागणारच, हा निसर्ग नियम आहे. आपण एखाद्या समुदायाच्या रक्षणासाठी अत्याचार प्रतिबंधक कायद्यांसारखे कायदे वापरणार असू तर त्याच कायद्यापासून संरक्षण मिळावं अशी मागणी इतर समुदाय करणार हे सुद्धा तितकच खरं आहे. त्यामुळेच काळजीपूर्वक अभ्यास केला तर या मोर्चांविषयी आश्चर्य वाटणार नाही; मात्र ते ज्या पद्धतीने होताहेत त्याबाबत मात्र आश्चर्य वाटतंय व या संपूर्ण विषयाबद्दल असूया म्हणा किंवा भीती किंवा अस्वस्थता किंवा शंका म्हणा जे काही म्हणायचं असेल ते म्हणा मात्र इतर समुदायांच्या मनात या भावना आहेत व त्याचं लक्ष्य मराठा समाज आहे हे सत्य आहे. याचं एकमेव कारण म्हणजे आपले शासनकर्ते तसंच विरोधी पक्ष (दोघांनी एकत्रितपणे सरकार चालवणं अपेक्षित आहे मात्र विरोधक हे नेहमी विसरतात) या मोर्चांविषयी तितकेच गोंधळेल्या मनस्थितीत आहेत व जे आपल्याला समजत नाही त्याची आपल्याला भीती वाटते किंवा आपल्याला मराठा समाजाच्या हेतूंविषयी शंका वाटते, हे स्वाभाविक आहे. संपूर्ण यंत्रणाच याला कारणीभूत आहे कारण आरक्षण व्यक्तिला जन्मतः मिळणाऱ्या जातीच्या आधारे दिलं जातं. मी अर्थातच कुणी सामाजिक विश्लेषक नाही मात्र ज्या कारणाने शिक्षणात किंवा सरकारी नोकरीमध्ये आरक्षणाच्या संकल्पनेचा समावेश करण्यात आला त्याचा परिणाम काय झाला आहे याचा विचार करायची वेळ आली आहे. कारण या यंत्रणेमुळे एखाद्या जातीला आनंद होत असेल मात्र त्याचवेळी शेकडो इतर जाती नाराज होत असतील तर कुठेतरी काहीतरी अतिशय चुकतंय. कारण केवळ महाराष्ट्रात मराठ्यांच्याच नाही तर गुजरातमध्ये पटेलांच्या, हरियाणात जाटांच्या अशाच मागण्या आहेत, केवळ मराठ्यांनी निदर्शने करण्यासाठी जो मार्ग निवडला तो वेगळा आहे. तामिळनाडूमध्ये आरक्षणाचे प्रमाण ६८% पर्यंत पोहोचले आहे असं म्हणतो. आपले सर्व शासनकर्ते व कायद्याविषयी पूर्णपणे आदर राखून असा प्रश्न विचारावासा वाटतो की कोणत्याही यंत्रणेचा एवढा मोठा भाग आरक्षणाच्या नावाखाली व्यापल्यानंतर त्याला आरक्षण कसे म्हणता येईल? हे एवढ्या प्रचंड वेगाने होत राहिलं तर या ना त्या जातीसाठी मिळुन शेवटी १००% आरक्षण द्यावं लागेल, मग त्यानंतर तथाकथित खुल्या वर्गवारीत कोण राहणार आहे व सरतेशेवटी आरक्षणाचा काय अर्थ आहे राहील?

या मोर्चा प्रकरणाचा एक पैलू म्हणजे बहुसंख्य मराठा कृषी आधारित कामांमध्ये, प्रामुख्याने शेतीमध्ये आहेत. ज्यांच्या शेताला भरपूर पाणीपुरवठा होतो म्हणजे ज्यांची बागायती शेती आहे त्यांचा काही प्रश्न नाही मात्र मोसमी पावसावर अवलंबून असलेली जिरायती शेती करणाऱ्यांना गेल्या काही वर्षात बेभरशाच्या पावसानं सर्वाधिक फटका बसला. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला ज्यांच्यामागे त्यांचं कुटुंब आहे, ज्यांचा उदरनिर्वाह चालवायला कुणी नाही. प्रत्येक सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची केवळ आश्वासनं दिली, हा कायमस्वरुपी उपाय नाही हे मान्य असलं तरीही. मात्र एकाही सरकारनं लहान शेतकऱ्यांना आरामदायक व स्थिर आयुष्य जगता येईल अशी भक्कम यंत्रणा तयार केली नाही. अशा फसलेल्या कृषी धोरणांमुळे पीडित शेतकऱ्यांना त्यांच्या व्यथा मांडण्यासाठी या मोर्चांनी एक व्यासपीठ दिलं.
सत्ताधारी सर्व मोठे नेते या जातीतले असूनही वर्षानुवर्षे काहीच बदललेले नाही, सामान्य मराठा माणसाच्या मनामध्ये अशी भावना जोर धरू लागली की त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी कधीच परिस्थिती बदलणार नाही व कुणीही आपली काळजी करत नाही! आपल्याला जे काही दिसतंय ते प्रत्येक व्यक्तिच्या मनाचं प्रतिबिंब आहे, ज्याला आपण सामान्य माणूस म्हणतो; केवळ मराठ्यांनी सर्वप्रथम निदर्शनं करायला सुरुवात केली. यात सगळ्यात विचारात घेण्यासारखी बाब म्हणजे आजकाल कुठेही एखादा मोर्चा किंवा काही हंगामा घडवून आणण्यासाठी प्रत्येक पक्षाला पैसे खर्च करावे लागतात, लोकांना बिर्याणीसारखी प्रलोभनं द्यावी लागतात, लोकांना गोळा करायला वाहनं पाठवावी लागतात. मात्र याउलट या मोर्चांमध्ये लाखो लोक स्वतःहून सहकुटुंब येत होते व फक्त शांतपणे चालत होते. म्हणुनच आपण ठोस पावलं उचलून या असंतोषाची दखल घेतलीच पाहिजे.

मात्र या निदर्शनांसोबतच मराठ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे केवळ आरक्षणाने त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, कारण ज्यांना अनेक वर्षांपासून आरक्षण आहे त्या जातींकडे पाहा. काळ बदलतोय व सरकारी नोकऱ्यांमध्ये किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये काही टक्के जागा आरक्षित ठेवून लाखो लोकांचं काय भलं होणार आहे? जग झपाट्याने विकसित होतंय व ब्राह्मण, जैन, सिंधी किंवा शिख लोकांना कधीही कोणतंही आरक्षण मागितलं नाही (किमान आत्तापर्यंत तरी) मात्र त्यांनी स्वतःमध्ये काळानुरूप बदल केले. नवीन क्षेत्र सर करण्याचा प्रयत्न करा, उत्कृष्टतेचा ध्यास घ्या त्यासाठी नवीन क्षितीजं शोधा, बाहेरचं जग कोणत्या भाषेत बोलतंय ते ऐका व ती स्वीकारा, सर्वांगीण विकासाचा हाच मार्ग आहे. अशाप्रकारे केवळ काही कुटुंबांचीच नाही तर संपूर्ण मराठा समाजाची प्रगती होईल. येत्या काही वर्षात ज्या समुदायाला जनतेच्या गरजा कळतील तोच टिकून राहील. माझ्याकडे नोकरीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला मी कधीही जात किंवा धर्म विचारत नाही, त्याचा किंवा तिचा कामाविषयीचा दृष्टीकोन किती प्रामाणिक आहे व तो किंवा ती जे काही करत आहे ते किती उत्कृष्टपणे करतात हे पाहतो. याचे कारण म्हणजे केवळ या दोनच गुणांमुळे तुम्ही कोणत्याही स्थितीत टिकून राहाल तर आरक्षणाच्या कुबड्यांमुळे आणखी कमजोर व्हाल व आणखी चांगली कामगिरी करण्याची क्षमता गमवून बसाल! हे बोलणं सोपं आहे हे मान्य आहे मात्र ज्यांनी आपला कुटुंब प्रमुख दुष्काळाच्या वणव्यात होरपळल्याने तसेच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे गमावला आहे त्यांना हे समजावणे अवघड आहे. मात्र आपण कायमस्वरुपी उपाययोजनेविषयी बोलत आहोत व कोणत्याही आरक्षणामुळे त्याची खात्री देता येणार नाही!

समाज माध्यमांमध्ये या मोर्चांच्या समर्थनार्थ तसेच विरुद्ध बरंच काही बोललं जातंय, मी इथे जे काही लिहीलंय आहे ते तिथेसुद्धा लिहीलं, लोकांच्या मनात असलेली भीती किंवा शंका समजून घेण्यासाठी तसंच मराठा जनतेने कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे हे वाचकांना समजावे यासाठी. मौन ही सर्वात मोठी शक्ती आहे व प्रत्येक शक्ती जबाबदारीने वापरली पाहिजे, एवढेच मला म्हणावेसे वाटते.

मी समाज माध्यमांवर मांडलेली माझी काही मते खाली देत आहे...

*मराठा मोर्चा ते ब्राह्मण सभा ते ओबीसी मोर्चा... मला समाज माध्यमांवर जाती किंवा धर्माशी संबंधित फॉरवर्ड/पोस्ट सतत मिळत असतात व मी ते वाचत असतो; त्याला माझं हे उत्तर...
समाज माध्यमांवर कोणत्या प्रकारचे संदेश फिरताहेत हे पाहा...मला असं वाटतंय आपण अतिशय चुकीच्या मार्गावर चाललो आहोत ज्यामुळे केवळ राज्याचाच नाही तर देशाचा विनाश होईल. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी व तथाकथित सर्व जातीच्या नेत्यांनी एकत्र येणं व देश हा धर्मापेक्षा व जातीपेक्षा महत्वाचा आहे हे ठरविण्याची वेळ आली आहे. आरक्षण आवश्यकच असेल तर ते उत्पन्नावर आधारित असलं पाहिजे व ते खरोखर अतिशय गरीब लोकांना दिलं पाहिजे ज्यांना पुरेसं अन्न किंवा चांगलं शिक्षण परवडू शकत नाही... नोकरीमध्ये काहीही आरक्षण नसावं मात्र सर्वांना चांगले शिक्षण घेण्याची समान संधी मिळेल याची खात्री करा व मुक्त स्पर्धा असू दे असं झालं तरच अधिक चांगला भारत तयार होण्याची आशा आहे!

देशासमोरची खरी समस्या आरक्षण नाही तर आधुनिक विज्ञानातील संशोधन व विकास, गृहनिर्माण व इतरही अनेक समस्या आहेत; रोजगार सर्वांनाच हवा आहे मात्र कुणीही रोजगार निर्मिती करायला तयार नाही. सर्वात महत्वाच्या समस्या आहेत देशातील निसर्गाला व जैवविविधतेला असलेला धोका. या समस्या सोडविण्यासाठी आपण एकजुटीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे... कधीतरी लोकांना हे समजेल अशी आशा करू मात्र तोपर्यंत कदाचित फार उशीर झाला असेल. तोपर्यंत माळढोकपक्ष्यांसारख्या अनेक प्रजाती व अनेक झाडे नामशेष होतील म्हणजेच कायमची नष्ट होतील. जर कुणाला आरक्षणाची खरी गरज असेल तर ती आहे झाडांना!
येथे प्रत्येक जण आधी मराठा आहे, ब्राह्मण, दलित, बौद्ध किंवा इतर कुठल्यातरी जातीचा आहे... मग भारतीय किंवा माणूस कुठे आहे?

*कुठल्याशा वृत्तपत्रामध्ये मराठा मोर्चासंदर्भात व्यंगचित्र आलंय; माझं सर्व मराठा व इतर मित्रांना एक आवाहन आहे...

प्रिय मित्रांनो, मी एफबीवरच्या तुमच्या सर्व टिप्पण्या व प्रतिक्रिया वाचतोय! मी ब्राह्मण आहे मात्र त्याआधी मी एक माणूस तसंच भारतीय आहे; तुम्ही जे उद्दिष्ट समोर ठेवलं आहे, त्यापासून अशा व्यंगचित्रांमुळे दूर होऊ नका. तुम्ही मोर्चामध्ये दाखवलेल्या शक्तिचं व संयमाचं असंच होईल, गांधीजींचा विचार करा, ते आपल्या उद्दिष्टापासून तसूभरही हलले नाहीत, आपल्या मार्गावर चालत राहिले त्यामुळे त्यांना हवं होतं ते साध्य करता आलं. लोकांना हवंय ते म्हणू द्या किंवा प्रतिक्रिया देऊ द्या, तुम्ही जो मार्ग निवडला आहे त्या मार्गावर निर्धाराने चालत राहा त्याचं उद्दिष्ट आम्हाला समजलं आहे. वर एका मित्राने मोर्चामध्ये वापरलेल्या झेड्यांचे बांबू  हत्यार म्हणून वापरू असे नमूद केले; तुम्ही हेच करावं असं लोकांना वाटतं, एक पाऊल चुकीचं पडलं तर मोर्चामुळे साध्य झालेला पूर्ण परिणाम नाहीसा होईल. म्हणूनच विचार करा व कोणत्याही नकारात्मक टिप्पणीला प्रतिक्रिया देऊ नका किंबहुना तिच्याकडे दुर्लक्ष करून तिचं महत्व कमी करा.

* अपेक्षेनुसार मराठा मोर्चांच्या यशाचा राजकीय पक्ष एकतर फायदा घेताहेत किंवा शांत राहून त्यावर टीका करताहेत. त्यानंतर अशीही तत्वे आहेत ज्यांना हे मोर्चे अपयशी व्हावेत असे वाटते व असे करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे मराठा समाजाला चुकीची प्रतिक्रिया द्यायला उद्युक्त करा म्हणजे ते कसे चुकीचे आहेत हे सिद्ध करणे सोपे होईल. त्यामुळेच शहाणपणाने पावले उचला, गरम डोक्याने नाही व उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करा... कोणत्याही पक्षाकडे किंवा व्यक्तिकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. म्हणूनच एकमेकांशी वाद घालणे किंवा प्रतिक्रिया देणे किंवा एखाद्या जातीला किंवा पक्षाला दोष देणे थांबवा. आपल्याच राज्यात पेशवे मराठा होते मात्र ते शाहू महाराजांचे उजवा हात होते, जे मराठा होते. त्यानंतर मोहिते, शिंदे, सुर्वे असे अनेक मराठा, पेशव्यांच्या म्हणजे ब्राह्मणांच्या नेतृत्वाखाली लढले! अनेक वर्ष मराठा, ब्राह्मण व इतर सर्व जाती ज्यात अगदी मुस्लिमांचाही समावेश होतो, त्या टिकून राहिल्या व त्यांनी एकत्रितपणे लढा दिला त्यासाठी त्यांना कोणत्याही अत्याचार प्रतिबंधक कायद्याची किंवा आरक्षणाची गरज पडली नाही केवळ योग्यता व लढण्याची क्षमता हेच निकष होते...आता एखादा राजकीय पक्ष काय म्हणाला किंवा एखाद्या वृत्तपत्राने काय छापलं यावर आपण प्रतिक्रिया देणार असलो, तर लक्षात ठेवा त्यांना रस असलेल्या गोष्टी व आपली उद्दिष्टे यात फरक आहे. म्हणूनच त्याकडे केवळ दुर्लक्ष करणे हा सर्वोत्तम उपाय आहे...

याच पार्श्वभूमीवर मी टाईम्स ऑफ इंडियामध्ये बातमी वाचली की टॉम हँक अलिकडेच भारतात आला होता व त्याला इथे अतिशय आश्चर्य वाटलं, तो म्हणाला, भारतामध्ये किती विविध प्रकारचे लोक एकत्र रहातात हे पाहून मला आश्चर्य वाटतं! मात्र मला टॉमला सांगावसं वाटतं ती केवळ एकत्र राहाणं आणि एकोप्यानं राहणं यात फरक आहे! मला असं वाटतं केवळ शासनकर्त्यांनीच नाही तर प्रत्येक भारतीयाने एकोप्याचा अर्थ समजून घेणे व त्यात आपापली भूमिका पार पाडणे आवश्यक आहे. नाहीतर असं पाहायला गेलं तर तुरुंगातही लोक एकत्र राहतात, नाही का?"...

संजय देशपांडे


Mobile: 09822037109


Friday 23 September 2016

वास्तुविशारद आणि वास्तु!





















"तुम्ही फक्त इमारतीचं बाह्य सौंदर्य पाहू नका; ईमारतीच्या पायाचं बांधकाम किती मजबूत आहे यावरूनच काळाच्या ओघात ईमारतीची खरी परीक्षा घेतली जाईल"... डेव्हिड ऍलन को.

या अमेरिकी गायकाच्या अतिशय समर्पक शब्दांनी, मी सिंहगड वास्तुविशारद महाविद्यालयात माझ्या भाषणाला सुरुवात केली. निमित्त होतं बांधकाम तंत्रज्ञान कार्यशाळेचं व बहुतेक विद्यार्थी पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षाचे विद्यार्थी होते. मला जेव्हा माझी मैत्रीण व तिथे काम करणारी प्राध्यापिका शिल्पा पांडे हिचं आमंत्रण मिळालं, मी एक अभियंता या भावी वास्तुविशारदांना काय सांगणार आहे असा विचार एक क्षणभर मनात आला. मी अनेकवेळा स्थापत्य अभियांत्रीकी विद्यार्थ्यांसमोर नियोजनामध्ये पर्यावरणाच्या घटकांचा कसा विचार करायचा याविषयी बोलतो, मात्र ते बहुतेक वेळा शेवटच्या वर्षातील विद्यार्थी असतात. मी कधीही वास्तुविशारदच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांसमोर बोललो नव्हतो ज्यांचे अजून रचना किंवा नियोजन हे विषय शिकून झालेले नसतात. तरीही मला या वयाच्या मुलांशी बोलायला आवडतं. स्वतःचं डोकं तरतरित ठेवायची ती एक उत्तम संधी असते असं मला वाटतं कारण त्यांच्याशी बोलताना तुम्हाला त्यांच्या एक पाऊल पुढे राहावं लागतं व त्यांच्याइतकीच नात्याने ताजा विचार करावा लागतो! त्यामुळे मला पूर्ण कल्पना होती की मला फार तांत्रिक बोलायचं नाही किंवा अभ्यासक्रमाच्या रचनेविषयी बोलायचं नाही. मला त्यांना महाविद्यालयातून उत्तीर्ण होऊन बाहेर पडल्यावर भविष्यात वास्तुविशारद म्हणून काम करताना कोणत्या गोष्टींना तोंड द्यावं लागेल, व कोणत्याही बांधकामात वास्तुविशारदाची भूमिका कशी महत्वाची असते हे समजून द्यायचं होतं. त्याचवेळी मला महाविद्यालयाने घेतलेल्या पुढाकाराचंही कौतुक वाटलं कारण ते विद्यार्थ्यांना बांधकामाच्या नव्या तंत्रांची तोंडओळख करून देत होते. इमारत म्हणजे एक नाणं असं मानलं तर वास्तुविशारद व अभियंता या नाण्याच्या दोन बाजू असतात! वास्तुविशारद फक्त कागदावर इमारतीचा आराखडा तयार करण्यात समाधान मानतो व त्या आराखड्यातून प्रत्यक्षात इमारत कशी उभी राहते याचा विचार तो क्वचितच करतो. त्याचवेळी अभियंताही त्याला वास्तुविशारदाकडून मिळालेल्या आराखड्याचे डोळे झाकून तंतोतंत पालन करतो, बांधकामाच्या नियोजनात तो स्वतःचं डोकं घालत नाही. या पार्श्वभूमीवर वास्तुविशारदांना इमारत कशी बांधली जाणार आहे याचं ज्ञान सुरुवातीलाच देणे हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम आहे व अर्थातच मला त्यांच्या भविष्यातल्या कारकिर्दीसाठी याचे महत्व त्यांना समजून सांगायचे होते.

म्हणूनच मी असे एक अवतरण निवडले जे बांधकामाच्या केवळ सौंदर्यापेक्षा त्याच्या पायाचे महत्व अधोरेखित करते. मी सुरुवातीलाच मान्य केलं की मी एका क्षणात हे आमंत्रण स्वीकारलं कारण मला वास्तुविशारदांसमोर बोलायची संधी मिळणार होती, एका अभियंत्याला वास्तुविशारदाला बोलायची संधी क्वचितच मिळते व मला ही संधी नक्कीच दवडायची नव्हती. कारण प्रत्यक्ष काम करताना वास्तुविशारदाचाच वरचष्मा असतो ज्याच्या सूचनांचे पालन अभियंत्याला करावे लागते. माझ्या बोलण्याने पिकलेला हशा शांत झाल्यावर, मी त्यांना जगातल्या काही अत्याधुनिक प्रसिद्ध इमारतींची छायाचित्रे दाखवली. यामागे दोन हेतू होते. तरुण श्रोते असतील तर त्यांचं लक्ष्य तुम्ही काय बोलताय याकडे राहावं यासाठी छायाचित्रे अतिशय महत्वाची कामगिरी बजावतात, त्याचप्रमाणे छायाचित्रांची जोड असल्यामुळे तुम्ही जे काही बोलताय ते त्यांना चटकन समजतं. म्हणूनच मी त्यांना क्वालालंपूरमधला पेट्रोनाचा दुहेरी टॉवर दाखवला, स्पेनमधलं गुगनहाएम दाखवलं, दुबईतल्या बुर्ल खलिफा व बुर्ज अल् अरब या इमारतींची तसंच दिल्लीतल्या लोटस टेंपलची छायाचित्रे दाखवली. या जगातल्या अत्याधुनिक इमारती मानल्या जातात, आता ही छायाचित्रं पाहून आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही कारण तुम्ही गुगल करून अशी हजारो छायाचित्रे मिळवू शकता. मात्र लक्षात घ्या तुम्ही या इमारतींविषयी अधिक माहिती गुगल करता तेव्हा सर्वप्रथम त्याच्या वास्तुविशारदाचे नाव दिलेले असते. सिझर पेली याने पेट्रोनाज टॉवरची रचना केली, फ्रँक घेरी यांनी गुगनहाएमची कल्पना केली, ऍड्रेन स्मिथ यांनी जगातल्या सर्वात उंच बुर्ज खलिफा या इमारतीचं स्वप्न पाहिलं व ते साकार केलं, टॉम राईट यांनी बुर्ज अरबच्या रुपानं जगातलं सर्वात उंच हॉटेल रेखाटलं व फरीबोर्झ साबा यांनी दिल्लीमधल्या लोटस टेंपलद्वारे भारताला अभिमान वाटेल अशी रचना दिली! तुम्ही गुगलवर शोध घेताना तुम्हाला जाणवेल की मानवी सृजनशीलतेचा विकास डौलाने मिरविणाऱ्या या इमारतींच्या बाबतीत सर्वप्रथम नाव घेतलं जातं ते वास्तुविशारदाचं! वास्तुविशारद व ही इमारत बांधण्यात सहभागी असलेल्या प्रत्येकामध्ये हाच नेमका फरक आहे. इतर जण त्या निर्मितीचा महत्वाचा घटक असतीलही मात्र केवळ कुणीतरी एकच व्यक्ती ते स्वप्न पाहते व कागदावर प्रत्यक्ष उतरवते म्हणजे इतरांनाही ते पाहता येतं आणि ती व्यक्ती म्हणजे ईमारतीचा वास्तुविशारद असतो
इमारत बांधण्यासाठी अभियंता लागतोच हे मान्य असलं तरीही एका व्यक्तिने त्या इमारतीची कल्पना करावी लागते व म्हणूनच वास्तुविशारद हे अतिशय महत्वाचे असतात! म्हणूनच एखादी इमारत वास्तुविशारदाच्या नावाने ओळखली जाते व अभियंत्याच्या नावाने ओळखली जात नाही. वास्तुविशारद हा इमारतीचा निर्माता व अभियंता ही निर्मिती प्रत्यक्ष साकार करणारा असतो. कोणतीही इमारत नाण्यासारखी असते व अभियंता व वास्तुविशारद या नाण्याच्या दोन बाजू आहेत असा विचार करा, म्हणूनच कोणतेही नाणे त्याच्या दोन्ही बाजू असल्याशिवाय पूर्ण होत नाही. एक वास्तुविशारद म्हणून तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की जे अस्तित्वात नाही त्याची कल्पना करणे व निर्मिती करणे ही एक कला आहे म्हणून वास्तुविशारद हा तुमच्यात असला पाहिजे. मी त्यांना सांगितले की अभियांत्रिकी हे विज्ञान आहे व ज्याचं डोकं चांगलं आहे तो कुणीही ते शिकू शकतो कारण शेवटी तो सगळा सूत्रांचा खेळ असतो. मात्र या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला कुणीही वास्तुविशारद बनविणार नाही, तर तुमचे प्राध्यापक तुम्हाला वास्तुविशारद कसे व्हायचे याचा केवळ मार्ग दाखवू शकतील, ज्यावरून तुम्हाला मार्गक्रमण करावे लागेल. मात्र त्याचवेळी वास्तुविशारदाने लक्षात ठेवले पाहिजे की त्याने किंवा तिने ज्या स्वरुपाचा विचार केला आहे त्याला अभियांत्रिकीची सूत्रे व सर्व भौतिक ज्ञानाच्या मर्यादा असतात. म्हणूनच त्यांनी अभियांत्रिकीची तंत्रे ज्यांना आपण बांधकामाच्या पद्धती म्हणतो ती शिकून घेतली तर नक्कीच मदत होईल. वास्तुविशारदाला त्याच्या मर्यादा माहिती असतील तसंच त्याची निर्मिती कशी साकार होणार आहे हे सुद्धा माहिती असेल तर याहून अधिक चांगले काय असू शकते? किंबहुना बांधकाम उद्योग वर्षानुवर्षे विशिष्ट तंत्रज्ञानाच्या विळख्यात अडकून पडला होता, याचे कारण म्हणजे विशेषतः आपल्या देशात या क्षेत्रात संशोधन व विकासाकडे फारसे कधीच लक्ष देण्यात आले नाही. म्हणूनच एखाद्या वास्तुविशारदाकडे काँक्रिट व पोलादापेक्षा इमारत बांधण्यासाठी काही नाविन्यपूर्ण कल्पना असतील, तर ते उद्योगासाठी सर्वोत्तम योगदान होऊ शकते. वास्तुविशारदाला स्थानिक भूगोल, भोवताली उपलब्ध असलेले बांधकामाचे साहित्य माहिती असणे आवश्यक आहे. राजस्थानात वालुकाश्म सहज उपलब्ध असताना तिथे काँक्रिटचे बांधकाम केले तर काय होईल किंवा कोकणात लाल जांभा भरपूर मिळतो अशा वेळी तिथे संगमरवर वापरला तर काय होईल; ती इमारत भयंकर दिसेल व वातावरणाशी विजोड वाटेल. मला व्यक्तिशः असं वाटतं की सर्वोत्तम इमारत इतर इमारतींपेक्षा वेगळीच दिसली पाहिजे असं नाही तर ती सभोवतालच्या परिसरात मिसळून गेली पाहिजे व त्यासाठी प्रत्येक ठिकाणी काय साहित्य उपलब्ध आहे याची माहिती असणे अत्यावश्यक आहे. आणखी एक पैलू म्हणजे बांधकाम खर्च, कुणाही ग्राहकाला तुमच्या रचनेमुळे स्वतःचे खिसे कापून घ्यायला आवडणार नाही!
आता प्रश्न येतो की, वास्तुविशारदाचं काम काय? आता बरेच जण म्हणतील हा काय प्रश्न आहे! मी स्पष्टच सांगितलं नाही का वास्तुविशारदाचं काम इमारतींची किंवा बांधकामांची निर्मिती व रचना करणे? अर्थातच मात्र यात एक अट आहे, वास्तुविशारदाला इमारतीची रचना त्याला किंवा तिला हवी तशी करण्याची मोकळीक नसते, त्याला ती ग्राहकाच्या गरजांनुसारच तयार करावी लागते. त्यामुळे ही सीमारेषा स्पष्टपणे समजून घ्यावी लागते, ग्राहकाला रुग्णालय हवे असेल तर तुम्ही हॉटेलची रचना करून चालणार नाही, मग ते कितीही उत्तम का असेना. त्यामुळे वास्तुविशारदाचे मुख्य काम म्हणजे ग्राहकाच्या मनातले जाणून घेणे व ग्राहकाला काय हवे आहे व त्याच्या गरजा काय आहेत हे समजून घेणे. लक्षात ठेवा ग्राहकाला काय हवं आहे व त्याच्या गरजा काय आहेत यात फरक असतो. इथेच थोडंसं तत्वज्ञान किंवा मानशास्त्राचा आधार घ्यावा लागतो कारण अनेकदा अगदी प्रौढ माणसालाही त्याला नेमकं काय हवं आहे व त्याच्या गरजा काय आहेत यातला फरक कळत नाही. उदाहरणार्थ मी तुमचा ग्राहक आहे व मला माझ्या कुटुंबासाठी एक घर बांधायचं आहे मात्र माझ्या घरात मला नेमक्या कोणत्या गोष्टींची गरज आहे व ते घर माझ्या गरजा जास्तीत जास्त पूर्ण कसं करेल हे मला माहिती नाही. यामध्ये ग्राहकाच्या कुटुंबाला जाणून घेणे, त्यांची जीवनशैली, आवडीनिवडी, प्रत्येक सदस्याला आवडणारे रंग, ते त्या घरामध्ये एकत्रितपणे व स्वतंत्रपणे कसा वेळ घालवतात हे समजून घ्यायची गरज आहे! इथे वास्तुविशारदाची भूमिका ग्राहकांच्या कुटुंबाशी त्यांच्या कौटुंबिक डॉक्टरांप्रमाणे बोलणे, त्यांच्या जीवनशैलीचे विश्लेषण करणे व त्यांना घराची कल्पना तयार करताना ते कुठे कमी पडताहेत हे समजून सांगणे व त्यानंतर त्यांच्यासाठी सर्वोत्तम घराची रचना करणे अशी असते; कारण बहुतेक लोकांना त्यांच्यासाठी काय सर्वोत्तम आहे हे माहिती नसते. हे प्रत्येक बांधकामाला लागू होते कारण तुम्ही रचना केलेले प्रत्येक बांधकाम, प्रत्येक ग्राहक व त्यांच्या गरजा वेगळ्या असतील.

तुम्ही सर्वजण जेव्हा या महाविद्यालयातून बाहेर पडाल, तेव्हा तुम्हा सर्व प्रकारच्या इमारतींची किंवा बांधकामांची रचना करायची संधी मिळेल, मग तो एखादा पूल असेल किंवा शाळा किंवा प्रदर्शन केंद्र किंवा प्रयोगशाळा; कोणत्याही रचनेचा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे ते बांधकाम कोणते लोक वापरणार आहेत. तुमच्या बांधकामाचं व त्याच्या रचनेचं यश हे तुम्ही नाही तर वापरकर्ता ठरविणार आहे. आजकाल आधुनिक स्थापत्यशास्त्र किंवा नागरी नियोजनामध्ये शाश्वतपणा हा शब्द त्याचा नेमका अर्थ जाणून न घेता सर्रास वापरला जातो. वास्तुविशारदाला तो त्याच्या निर्मितीमधून पर्यावरणाशिवाय आणखी कोणत्या गोष्टी टिकवणार आहे हे माहिती असले पाहिजे, सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला ते बांधकाम जी व्यक्ती वापरणार आहे तिची मानसिक शांतता टिकवता आली पाहिजे. चुकीची रचना वापरकर्त्याची किंवा त्या इमारतीमध्ये राहणाऱ्याची मनःशांती म्हणा किंवा आनंद हिरावून घेऊ शकते व वास्तुविशारदासाठी हे सर्वात मोठे आव्हान असते. ते सार्वजनिक उद्यान असेल तर लोकांना त्या उद्यानामध्ये आरामादायक कसे वाटेल हे समजून घेण्याचा व त्यानुसार जागा तयार करण्याचा प्रयत्न करा. ती जर एखादी शाळा असेल तर शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना वर्गांपासून ते मार्गिकेपर्यंत प्रत्येक कोपरा वापरण्यास अतिशय सहज आहे असे वाटले पाहिजे. यासाठीच वास्तुविशारदाला तो इमारतीची रचना का करतो आहे हे माहिती असले पाहिजे; म्हणजेच तुम्ही कुणासाठी या इमारतीची रचना करताय हे तुम्हाला माहिती असले पाहिजे!

आजच्या युगात हे सगळं करताना तुमच्या समोर असलेलं सगळ्यात मोठ्ठ आव्हान म्हणजे तुमच्या ग्राहकासोबतच निसर्गाच्या शांततेचा समतोल राखणे. एक लक्षात ठेवा, इको-फ्रेंडली किंवा निसर्ग-पूरक असं काहीच नसतं मनुष्य-निर्मित कोणतंही बांधकाम ज्या जागेवर बांधलं जातं ती ओसाड जागा असली तरी तिथे गांडुळासारखे किटक किंवा मुंग्या आनंदाने राहातच असतात. माणूस सोडला तर दुसऱ्या कोणत्याच प्रजातीला स्वतःसाठी घर बांधायला वास्तुविशारदाची सेवा घ्यायचं स्वातंत्र्य नसतं. म्हणूनच स्थापत्यशास्त्राचे ज्ञान घेताना तुमचे मानवाशिवाय इतर प्रजातींबद्दलची आपली जबाबदारी काय आहे हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. तुम्ही जेव्हा तुमच्या स्वप्नातला प्रकल्प साकार करता तेव्हा नैसर्गिक भूरचनेची किंवा पशु-पक्ष्यांच्या नैसर्गिक निवासस्थानाची कमीत कमी हानी होईल याचा विचार करा. त्यामध्ये पक्षांसाठी, फुलपाखरांसाठी, इतकंच काय गाडुंळांनाही आपल्यासोबत वाढायला जागा ठेवा. पृथ्वीवर राहायचा अधिकार फक्त माणसालाच नाही तर प्रत्येक सजीवाचा जमीनीच्या लहानात लहान तुकड्यावर तितकाच हक्क आहे. तुम्ही तुमच्या रचनांमधून त्यांना हा हक्क मिळवून देऊ शकता. आपली जीवनशैली जपण्याच्या हव्यासापायी आपण अनेक प्रजातींच्या निवासस्थानावर अतिक्रमण करून त्यांना नामशेष करतो, आपण काही पुरातन काळात परत जाऊ शकत नाही व गुहांमध्ये तसंच झाडांवर राहायला सुरुवात करू शकत नाही. मात्र तुम्ही जेव्हा रचना करता तेव्हा या पैलूचा नेहमी विचार करा, बाकीचं आपोआप सुचत जाईल!

सर्वात शेवटी यशस्वी वास्तुविशारद होण्यासाठी मला काही सूचना द्याव्याशा वाटतात, त्या अगदी सोप्या आहेत; वाचा, पाहा, प्रवास करा, लिहा, जास्तीत जास्त ग्रहण करा व इतरांना सांगा! तुम्हाला जेवढं जास्त शक्य होईल तेवढं वाचा कारण त्यामुळे तुम्ही लोकांविषयी व त्यांच्या गरजांविषयी विचार करू शकाल. कार्टुनपट, सुपर हिरो ते अगदी प्रेमपटापर्यंत सगळे चित्रपट पाहा यामुळे तुमच्या कल्पनाशक्तीला चालना मिळेल. वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करा कारण त्यामुळे तुम्हाला विविध ठिकाणे पाहता येतील व जगभरातल्या निवासस्थानांविषयी व पृथ्वीवरच्या विविधतेविषयी जाणून घेता येईल. लिहा कारण तुम्हाला जे काही वाटतं ते व्यक्त करण्याचा तो एक मार्ग आहे, एक लक्षात ठेवा एक वास्तुविशारद म्हणून तुमची रेखाटने, आराखडे ही तुमची भाषा आहे. म्हणूनच तुम्ही जे शिकला आहात ते तुमच्या रचनांमधून दिसून येईल. तुम्ही जे पाहिले आहे व ऐकले आहे ते ग्रहण करा, कारण पाहणे व निरीक्षण करणे तसेच ऐकणे व श्रवण करणे यात फरक आहे! तुम्हाला जे समजले आहे ते तुमच्या कुटुंबाला, मित्रांना व शिक्षकांना सांगा कारण तरच तुमच्यामध्ये आणखी ज्ञान ग्रहण करण्यासाठी जागा तयार होईल.

सर्वात शेवटी मी इतकच म्हणेन की एक यशस्वी वास्तुविशारद म्हणजे लठ्ठ शुल्क आकारणारा, अतिश्रीमंत ग्राहक असलेला नाही तर जो त्याच्या इमारतीतल्या रहिवाशांच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकतो तो खरा यशस्वी वास्तुविशारद. तुम्ही तुमच्या कारकिर्दीत अनेक इमारतींची रचना कराल मात्र जेव्हा तुम्ही रचना केलेल्या इमारतीसमोर उभे राहाल तेव्हा तुम्हाला तिचा अभिमान व जिव्हाळा वाटला पाहिजे, तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने निर्माता म्हणता येईल! चला तर मग, तुमच्या विविध निर्मितींमधून एका अधिक चांगलं जग तयार करा, माझ्या तुम्हा सर्वांना याच शुभेच्छा आहेत.


संजय देशपांडे


Mobile: 09822037109








Thursday 15 September 2016

प्रकल्प नव्हे समाज बांधतांना !




















समाज हा केवळ व्यक्तिंचा बनत नाही तर त्यांच्या परस्पर संबंधांमधून बनतो, या नात्यांचे बंध या व्यक्तिंना जोडून ठेवतात   … कार्ल मार्क्स

कार्ल मार्क्स हा तत्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, पत्रकार व क्रांतिकारी समाजवादी होता. प्रशियामध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म झाला, त्याने नंतर राजकीय अर्थशास्त्र व हेगेलियन तत्वज्ञान यांचा अभ्यास केला. एखाद्याचे वर्णन करताना शब्द अपुरे पडतात असं म्हणतात त्याचं हे उत्तम उदाहरण आहे, माझ्याकडे कार्ल मार्क्स किती महान होता याचं वर्णन करण्यासाठी शब्द नाहीत! त्याने स्वतःच्या विचारांनी जगाची विचार करण्याची पद्धत बदलली!  माणूस हा समाजप्रिय प्राणी असल्याचं त्याचं विधान सर्वमान्य झालं व ते मार्क्सचं तत्वज्ञान म्हणून ओळखलं जाऊ लागलं, त्याला एखाद्या धर्माप्रमाणेच मान्यता मिळाली! मला त्याचे समाजाविषयीचे वरील शब्द आठवायचे कारण म्हणजे मला आमच्या दोन पूर्ण झालेल्या प्रकल्पांमध्ये अलिकडेच बोलावण्यात आले होते व त्यातले साधर्म्य इथेच संपत नाही. दोन्ही प्रकल्प पूर्ण होऊन एका वर्षापेक्षा अधिक काळ झाला, त्यातला एक प्रकल्प तर जवळपास चार वर्षांपूर्वी पूर्ण झाला! दोन्ही ठिकाणी तिथल्या सोसायटीचे सदस्य काही सांस्कृतिक उत्सव साजरा करत होते म्हणून मला आमंत्रण होतं. त्यापैकी एका कार्यक्रमात माझा रिअल इस्टेट ब्लॉगर गुरु रवी करंदीकर माझ्यासोबत होता व तो सदस्यांच्या भक्तिभावाने इतका भारावून गेला की दुसऱ्या दिवशी हे सदस्य करत असलेल्या पूजेचे संपूर्ण ध्वनीचित्रमुद्रण करण्यासाठी पुन्हा तिथे गेला!

आता तुमची उत्सुकता फार न ताणता तपशीलाने सांगतो; पहिला प्रकल्प होता दवबिंदू, जो तरुण आयटी अभियंत्यांच्या गरजेनुसार बनवलेला प्रकल्प आहे. या प्रकल्पातील सर्व सदस्य धार्मिकतेसाठी प्रसिद्ध असलेल्या जैन समुदायाचे आहेत. दुसरा प्रकल्प म्हणजे अष्टगंध, ही साधारण तीस सदनिकांची लहानशी सोसायटी आहे, दोन्ही प्रकल्प पुण्याच्या पश्चिम उपनगरांमध्ये आहेत. दोन्ही प्रकल्पांमध्ये तरण तलाव किंवा व्यायामशाळा यासारख्या उंची सुविधा नाहीत किंवा सुशोभित स्वागतकक्ष नाही, इथे इटालियन मार्बल किंवा केंद्रीय वातानुकूलन यंत्रणेसारख्या सुविधा नाहीत; तरीही एक गोष्ट मात्र इथे आहे, ती म्हणजे इथल्या रहिवाशांनी जेव्हा माझं स्वागत केलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर दिसलेला निःस्सीम आनंद व उत्साह
दवबिंदूमध्ये, सर्व रहिवासी जैन असल्यामुळे त्यांनी एक लहानसे जैन मंदिर बांधण्यासाठी त्यांच्या मोकळ्या जागेचा वापर केला आहे. इथेही बरेच जण म्हणतील की, मोकळ्या जागी त्यांनी क्लब हाऊस किंवा व्यायामशाळा बांधायला हवी होती किंवा लॉन करायला हवं होतं, जसं आपल्या बहुतेक प्रकल्पांमध्ये असतं. मात्र या प्रकल्पातील मोकळ्या जागांचा खरा उद्देश रहिवाशांना आनंद व शांतता मिळावी, त्यांना एकत्र येता यावं हाच आहे असं मला वाटतं. जर त्यांनी एखादं लहानसं जैन मंदिर बांधलं, जिथे ते एकत्र येऊ शकतील, प्रार्थना करू शकतील व त्यातून त्यांना आनंद व शांतता मिळली तर त्याला कुणाची काय हरकत असू शकते? किंबहुना हे तरुण त्यांचा धर्म ही त्यांची जीवनशैली व्हावी या हेतूनेच एकत्र आले व केवळ एक सोसायटी स्थापन करायची म्हणून हा प्रकल्प तयार झाला नाही तर स्वतःचा एक समुदाय तयार करणं हा त्यांचा उद्देश होता! मला अतिशय आनंद वाटतो की ते ज्या उद्देशाने माझ्याकडे आले होते तो पूर्ण झाला! रवीने त्यांची मुलाखत घेतली व त्यांना पेचात पाडणारे भरपूर प्रश्न विचारले (तो त्यात तरबेज आहे) मात्र त्यांनी एखाद्या साधूप्रमाणे अतिशय संयमाने त्याची उत्तरे दिली, आणि हो त्यातल्या बऱ्याचजणांची जीवनशैली खरोखरच साधूसारखीच आहे

हा अशा काही आयटी व्यावसायिकांचा समूह आहे की जे शनिवार-रविवारी मित्रमंडळींसोबत पबमध्ये दारूच्या पार्ट्या करत नाहीत, सूर्यास्तापूर्वी जेवतात व पहाटे लवकर उठतात, थंड पाण्याने अंघोळ करतात व त्यांच्या मंदिरात पूजेसाठी तयार होतात! आम्हाला त्यांना त्यांच्या संकुलामध्ये मंदिरासाठी जागा करून द्यायची होती! दवबिंदूच्या रहिवाशांनी मला त्यांच्या पर्यूषण पर्वानिमित्त आमंत्रण दिलं होतं. या पवित्र महिन्यात बहुतेक जैन लोक उपवास करतात व जैन साधू व साध्वी शांत व निरामय जीवनाविषयी व्याख्याने देतात. मी रवीलाही माझ्यासोबत घेऊन गेलो कारण त्याला त्यांच्या जीवनशैलीविषयी प्रश्न विचारायचे होते व त्यांच्या घर खरेदी करायच्या अनुभवाविषयी जाणून घ्यायचे होते. यापैकी बहुतेक तरूण मध्यप्रदेश किंवा राजस्थान या राज्यांमधील आहेत. यातली सर्वोत्तम गोष्ट म्हणजे त्यांचे आईवडील आधी त्यांचे मूळ गाव सोडून त्यांच्यासोबत राहायला तयार नव्हते मात्र जेव्हा त्यांनी दवबिंदूमधील संस्कृती व सामुदायिक जीवन पाहिले, तेव्हा त्यांनी स्वतःहून पुण्याला यायला व मुलांसोबत राहायला सुरुवात केली!

मला असं वाटतं आम्ही केलेल्या बांधकामातून ही सर्वात चांगली बाब झाली, कारण आपल्या कुटुंबामुळे घर तयार होतं आपण दिलेल्या सुविधांमुळे नाही. जर आमच्या घरांमुळे लोक एका कुटुंबाप्रमाणे जवळ येणार असतील तर याहून अधिक चांगलं काय होऊ शकतं? त्यांच्या मुलाखतींमधून या तरूण पिढीला त्यांच्या बांधकाम व्यावसायिकांसोबतच्या संवादाविषयी काय वाटतं हे समजलं; त्यांना असं वाटतं की चांगला बांधकाम व्यावसायिक ठरवताना योग्य संवाद हा अतिशय महत्वाचा घटक आहे. ते अनेक बांधकाम व्यावसायिकांना भेटले मात्र त्यांच्या चौकशीला वेळेत उत्तरे कधीच मिळाली नाहीत, त्यांच्यादृष्टिने हे कामाशी बांधलकी नसल्याचे लक्षण आहे! इथे बांधकाम व्यावसायिक म्हणजे केवळ एक व्यक्ती असं नाही तर त्याचा संपूर्ण चमू असा अर्थ होतो, रिअल इस्टेटने याची दखल घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर या सोसायटीच्या सदस्यांनी आमच्या चमूचं कौतुक केलं कारण त्यांच्यापैकी कुणीही ईमेलद्वारे काही विचारणा केल्यास आम्ही त्यांना चोवीस तासात उत्तर दिलं होतं! मी इथे आमचा मोठेपणा सांगत नाही मात्र या अनुभवाचा इतरांना फायदा होऊ शकतो, कोणत्याही व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारे संवाद साधणं हे अतिशय महत्वाचं आहे, मला पूर्णपणे आदर राखत एक कटू सत्य सांगावसं वाटतं की आपण भारतीय त्यात कमी पडतो!

दुसरा प्रसंग बाणेरच्या अष्टगंधमधला होता ज्याचा पहिला टप्पा आम्ही चार वर्षांपूर्वीच पूर्ण केला व हस्तांतरित केला! ज्यांना रिअल इस्टेट उद्योगाविषयी फारशी माहिती नसेल त्यांना कदाचित प्रकल्प हस्तांतरित होऊन चार वर्ष पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमाला बांधकाम व्यावसायिकाला सपत्निक बोलावण्याचे विशेष महत्व वाटणार नाही! प्रकल्प हस्तांतरित केल्यानंतर चार वर्षांनी बांधकाम व्यावसायिकाने पुन्हा तिथे भेट द्यायला हिंमत लागते एवढे मात्र मी निश्चित सांगू शकतो! अष्टगंधचे रहिवासी गणेशोत्सव साजरा करत होते व त्यांनी नृत्य, गायन, पाककला स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं व त्यांनी मला पारितोषिक वितरणाला प्रमुख पाहुणा म्हणून हजर रहावं अशी विनंती केली होती. मी अतिशय आनंदानं त्यांचं आमंत्रण स्वीकारलं कारण अशा भेटागाठींमधून मला ग्राहकांना भेटता येतं, त्यांची जीवनशैली जाणून घेता येते व यातून व्यवसायाविषयी बरंच काही शिकता येतं. यामध्ये बांधकाम व्यवसायिकाला एक धोका असतोच कारण अशा कार्यक्रमांमध्ये तुम्ही सगळ्या ग्राहकांना समाधानी करू शकत नाही व असे ग्राहक तुम्हाला सार्वजनिकपणे तोंडघशी पाडू शकतात. मात्र तुम्ही आपल्या कामाशी शंभर टक्के बांधील असाल तर कशाला काळजी करायची व मला वैयक्तिकपणे असे वाटते की अशी आव्हाने स्वीकारली पाहिजेत. मला आश्चर्यच वाटलं कारण अध्यक्ष/सचिवांनी माझा फक्त सत्कारच केला नाही तर त्यांना स्वर्गासारखं घर दिल्याबद्दल माझे आभारही मानले! माझ्यासाठी हा अतिशय हृदयस्पर्शी अनुभव होता, त्यातल्या कुणीही इमारतींच्या समस्यांविषयी गाऱ्हाणी सांगितली नाहीत, सर्व रहिवासी अतिशय आनंदी व उत्साही होते. दहा दिवस वेगवेगळी कुटुंबं गणपतीची आरती करत होती व आवर्जुन घरी बनवलेलाच प्रसाद वाटला जात होता. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सगळ्यांनाच त्यांच्या सहकार्यासाठी व सहभागासाठी बक्षिस देण्यात आलं ज्यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच समावेश होता! या सोसायटीला फार मोठी मोकळी जागा नाही किंवा कॉमन रूमही नाही मात्र सगळेजण पार्किंगची जागा अशा कार्यक्रमांसाठी आनंदाने वापरतात.

मला वाटतं अशा प्रकारच्या होत असलेल्या सोसायट्यांमधून समाज तयार होतो, या दोन्ही प्रकल्पांमध्ये आम्ही फार काही उल्लेखनीय काम केले आहे असे मी म्हणणार नाही. त्या साध्या इमारती आहेत व त्यामध्ये पावसाळ्यात क्वचित गळणे किंवा झिरपणे यासारख्या समस्या होतात. पायाभूत सुविधांच्या आघाडीवर या भागामध्ये सांडपाण्याच्या वाहिन्यांचे जाळेच नसणे यासारख्या बाबी आमच्या नियंत्रणाच्याबाहेरच्या होत्या व रहिवाशांना त्याचा जरूर त्रास झाला असता, मात्र संवाद व एकमेकांवर विश्वास सदैव होता

बांधकाम व्यावसायिक म्हणून या प्रकल्पांमध्ये झालेल्या दोन्ही कार्यक्रमांमधून मला जे काही शिकायला मिळाले ते कोणत्याही व्यवस्थापन महाविद्यालयात शिकायला मिळाले नसते; यातून मला समजले की ग्राहकांना खुश ठेवण्यासाठी त्यांना महागड्या भेटवस्तू दिल्या पाहिजेत किंवा कारागिरी अद्ययावत असली पाहिजे असे नाही. तुम्ही त्यांना जे काही आश्वासन दिले आहे ते पूर्ण करा. तुमचे काम घर बांधणे आहे ते प्रामाणिकपणे करा व सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही केवळ बांधकाम व्यावसायिक म्हणून नाही तर त्यांच्यातलेच एक आहात अशाप्रकारे त्यांच्यासाठी उपलब्ध व्हा! बांधकाम व्यावसायिक म्हणून आपण पूर्ण केलेल्या प्रकल्पांविषयी आपण विचारही करत नाही त्यामुळे त्यांना भेट देणे ही तर फार दूरची गोष्ट झाली, मात्र हळूहळू हा कल बदलतोय. केवळ समाजकार्याच्या दृष्टिकोनातूनच नाही तर विपणनाच्या दृष्टिकोनातूनही शक्य असेल तेव्हा स्वतः तुमच्या ग्राहकांशी संपर्क साधणे ही व्यवसायाची गरज आहे. आपण आपल्या पूर्ण झालेल्या प्रकल्पांमधील रहिवाशांनी एकत्र येऊन असे सणवार साजरे करण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकतो, तसंच अशा कार्यक्रमांसाठी आपणही थोडाफार निधी द्यायचा विचार करू शकतो. आपण बांधलेल्या एखाद्या इमारतीला आपण जेव्हा घर म्हणतो तेव्हा आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की एकत्र येणं हा कुठल्याही घराचा पाया आहे व बांधकाम व्यावसायिक म्हणून तुम्हाला फक्त पायाभरणी करायची आहे! रिअल इस्टेटमधल्या लोकांनी व्यवसायाचं हे साधं सोपं गणित समजून घ्यायची वेळ आली आहे, त्यासाठी फार खर्च येत नाही फक्त तुमच्या हातात असलेलं काम तुम्हाला प्रामाणिकपणे करावं लागतं.

बांधकाम व्यावसायिकाचं उद्दिष्ट काय असलं पाहिजे? या प्रश्नाचं उत्तर मला दवबिंदू व अष्टगंधमध्ये झालेल्या कार्यक्रमांमधून मिळालं. नफा मिळवणं हे उद्दिष्ट आहेच, मात्र रहिवाशांचे आनंदी चेहरे मला सांगत होते की तुम्ही एक अशी सोसायटी तयार केली आहे जिथे अनेक पिढ्या नांदणार आहेत, त्यांची सांस्कृतिक भरभराट होणार आहे व त्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत; बांधकाम व्यावसायिक म्हणून हे माझं काम आहे याची मी स्वतःला आठवण करून दिली. मी त्या रहिवाशांना सांगितलं; खरंतर मी तुमचा आभारी आहे कारण तुम्ही मला माझ्या कर्तव्याची जाणीव करून दिली, कारण कोणत्याही ध्येयाशिवाय जीवनाला काय अर्थ आहे! कार्ल मार्क्सने म्हटल्याप्रमाणे समाजातील व्यक्तिंमधील परस्पर संबंध हा समाजाचा सर्वात महत्वाचा घटक असतो व बांधकाम व्यावसायिकाला केवळ पहिले पाऊल उचलावे लागते; समाज निर्मितीचा हाच मार्ग आहे, केवळ आपल्या नावावर नवे प्रकल्प जमा झाल्याने ते होणार नाही!


संजय देशपांडे


Mobile: 09822037109

Thursday 8 September 2016

समाधानी ग्राहक आणि बांधकाम व्यवसाय !



















तुमच्या सर्वात असमाधानी ग्राहकांकडून तुम्हाला बरेच काही शिकण्यासारखे असते”... बिल गेट्स

मायक्रोसॉफ्टचे प्रमुख बिल गेट्स यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. ते गेली अनेक वर्ष जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत  पहिल्या तिघांत आहेत, कदाचित त्यांनी आता ही वर्षं मोजणं सोडून दिलं असेल! जगात अशा काही व्यक्ती आहेत ज्यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज भासत नाही, मात्र मला खरोखर असं वाटतं की लोकांना या व्यक्तिंविषयी नेमकी किती माहिती असते? उदाहरणार्थ, मी जेव्हा म्हणतो की बहुतेक लोक श्री. बिल गेट्स यांना ओळखतात, त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण मध्येच सोडलं त्यानंतर मायक्रोसॉफ्ट सुरु केली व नंतर त्यांनी विंडोज नावाची संगणकप्रणाली तयार केली वगैरे सगळ्यांना माहिती असतं. मात्र किती लोकांना बिल गेट्स एक व्यक्ती म्हणून कसे आहेत किंवा त्यांचं तत्वज्ञान कसं आहे व ते सध्या जिथे आहेत तिथे कसे पोहोचले हे प्रत्यक्षात कुठे माहिती असतं? मला खात्री आहे ही श्री गेट्स यांच्या या पैलूविषयी फारसं कुणालाच माहिती नसेल! जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होणे व ते स्थान वर्षानुवर्षे टिकवून ठेवणे सोपे नाही. विशेषतः तुमच्या व्यवसायाद्वारे तुम्ही जगभरातल्या लाखो लोकांना सेवा देता तेव्हा; तेव्हा या लाखो ग्राहकांना खुश कसं ठेवायचं हे तुम्ही शिकल्याशिवाय तुम्हाला श्रीमंत राहता येत नाही! म्हणूनच त्यांच्या विधानांमधून आपल्याला बिल गेट्स नेमके कसे आहेत, त्यांना त्यांच्या उत्पादनाविषयी काय वाटते व आपल्या ग्राहकांना आनंदी ठेवण्यासाठी त्यांचे काय तत्वज्ञान आहे हे समजते

दुर्दैवाने आपल्या देशात, असमाधानी ग्राहकांची संख्या अतिशय सर्वाधिक असताना, रिअल इस्टेट उद्योग त्यातून काहीही शिकलेला नाही. माझे हे निवेदन माझ्या अनेक मित्रांना आवडणार नाही मात्र आपल्या उद्योगाच्या भूतकाळातून व वर्तमानकाळातून आपल्याला हेच दिसून येते हे तथ्य आहे. ताज्या सर्वेक्षणानुसार देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये ग्राहक न्यायालयामध्ये रिअल इस्टेटच्या ग्राहकांनी दाखल केलेले पन्नास हजारांहून अधिक वाद किंवा खटले प्रलंबित आहेत. इतर कुठल्याही उत्पादनाच्या ग्राहकांपेक्षा ही संख्या मोठी आहे, याचाच अर्थ असा होतो की रिअल इस्टेटमध्ये असमाधानी ग्राहकांची संख्या सर्वाधिक आहे. तज्ञांचा असा दावा आहे की हे हिमनगाचे टोक आहे कारण अनेक ग्राहक बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध तक्रार दाखल करायला समोर येत नाहीत कारण ही प्रक्रिया लांबलचक असते व न्याय मिळेलच याची काही शाश्वती नसते! नक्कीच रिअल इस्टेट उद्योग कुठेतरी चुकतोय किंवा या उद्योगाचं नियंत्रण करणारी यंत्रणा कुठेतरी चुकतेय नाहीतर इथे असामाधानी किंवा नाखुश ग्राहकांचं प्रमाण एवढं मोठं असण्याचं काय कारण आहे? मात्र एका अर्थानी पाहिलं तर ही संख्या फार मोठी आहे असं मी म्हणणार नाही कारण केवळ पुणे शहरात दरवर्षी एक लाखाहून अधिक नवीन घरे बांधली जातात. मात्र या समस्येचे विश्लेषण करण्यासाठी आपण आधी रिअल इस्टेटचे स्वरुप समजून घेतले पाहिजे व त्यानंतर आपण ग्राहकास काय हवं आहे हे विचारात घेऊन रिअल इस्टेटच्या गरजांचे विश्लेषण करू शकतो? त्याचवेळी रिअल इस्टेटमध्ये कोणत्याही माहितीचा किंवा सांख्यिकीचा अचूक किंवा अधिकृत सरकारी डेटा उपलब्ध नाही, आपल्याला जे काही उपलब्ध होतं ते एखाद्या खाजगी कंपनीनं केलेल्या सर्वेक्षणातून घेतलेलं असतं.
रिअल इस्टेट उद्योग जेव्हा ८०च्या दशकात केवळ दिल्ली किंवा मुंबई या शहरांपुरताच मर्यादित होता तेव्हा, बांधकाम व्यावसायिकही कमी होते व ग्राहकांच्या अपेक्षाही मर्यादित होत्या. जमीन ही आजच्यासारखी दुर्मिळ गोष्ट नव्हती व बहुतेक बांधकाम व्यावसायिक हे समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्ती असायचे. मात्र तरीही रिअल इस्टेट कधीही ऑटो किंवा औषधनिर्मिती यासारखा व्यावसायिक उद्योग नव्हता, कारण त्यामध्ये नेहमीच मानवी हस्तक्षेप होता, संशोधन किंवा विकास किंवा यांत्रिक प्रक्रियांचा वापर अतिशय कमी किंवा शून्य होता. इथे बहुतेक व्यवहार बांधकाम व्यावसायिकांनी कशाचे आश्वासन दिले आहे किंवा त्यांच्या माहिती पत्रकात काय छापले आहे यावर अवलंबून असतात. त्याचशिवाय रिअल इस्टेटचे नियंत्रण करणारे कायदे अतिशय गुंतागुंतीचे आहेत, त्यातच मंजुरी देणारी प्राधिकरणे, तसेच करार, नोंदणी यासारख्या प्रक्रियाही असतात ज्या इतर उत्पादने खरेदी करताना कराव्या लागत नाहीत. रिअल इस्टेटमध्ये पूर्वी सगळे व्यवहार समोरासमोर व्हायचे, विक्री दरापासून ते चटई क्षेत्रापर्यंत सगळं काही स्पष्टपणे सांगितलं जायचं, सर्वात महत्वाचं म्हणजं बांधकाम व्यावसायिक नावाचा माणूस ग्राहकांसाठी नेहमी उपलब्ध असायचा! आजकाल विक्री दर प्रत्येक प्रकल्पानुसार बदलतातच मात्र ते प्रत्येक ग्राहकानुसारही बदलू शकतात; तेव्हा दर स्थिर होते व प्रकल्प गडबडीने सुरु करण्यासाठी स्पर्धा नसायची. त्यानंतर ९०च्या दशकात मध्यमवर्गीयांच्या हातात पैसा खेळू लागला, अचानक जमीनीला सोन्याचा भाव आला व प्रत्येकालाच रिअल इस्टेटशी जोडलं जावं असं वाटू लागलं. तो गरजूंच्या मूलभूत गरजा पूर्ण करणारा उद्योग राहिला नाही तर सोन्याची खाण झाली. मला असं वाटतं रिअल इस्टेटला असलेला सर्वात मोठा शाप म्हणजे लोक रिअल इस्टेटचा मुख्य उद्देश काय आहे हेच विसरले. रिअल इस्टेटचा मुख्य उद्देश समाजाची मूलभूत गरज म्हणजे घर बांधणे हा आहे हे विसरून अनेकांसाठी तो केवळ पैसे कमावण्याचा उद्योग झाला

हेन्री फोर्ड यांनी म्हटल्याप्रमाणे, “केवळ पैसे मिळविणारा उद्योग हा वाईट उद्योग असतो”, या व्यवस्थेप्रमाणे, रिअल इस्टेट हळूहळू २०व्या शतकापर्यंत एक वाईट उद्योग झाला! त्यानंतर वर्षागणिक केवळ पैशांच्या बाबतीतच नाही तर एकूणच व्यवसाय म्हणुन पण रिअल इस्टेट उद्योगाची प्रतिष्ठा कमी होत गेली व असामाधी ग्राहकांची संख्या वाढत गेली! याचे कारण साधे होते बहुतेक लोकांनी केवळ दाम दुप्पट होतील किंवा चांगला परतावा मिळेल या आशाने रिअल इस्टेटमध्ये प्रवेश केला. त्याचवेळी शहरातील जमीनीचे दर आकाशाला भिडू लागले होते व जमीन खरेदी करण्यासाठीचे युद्ध अधिक कडवे होऊ लागले होतेजमीन मिळविण्यासाठी सुरु झालेल्या या युद्धामुळे कोणत्याही व्यवसायासाठी आवश्यक असलेला दर्जा, मूल्ये, ग्राहक केंद्रित दृष्टिकोन इत्यादी बाबी रिअल इस्टेट उद्योगातून नाहीशा झाल्या. यशस्वी बांधकाम व्यावसायिक होण्यासाठीचे निकष झपाट्याने बदलू लागले; आता बांधकाम व्यावसायिक होण्यासाठी पैसा व ताकद या गोष्टी सर्वात जास्त गरजेच्या झाल्या आहेत. रिअल इस्टेटमध्ये चांगल्या कार्य पद्धतींची कुणालाही फिकीर नाही तसंच ग्राहकांच्या गरजांचा विचार करायची कुणाला गरज वाटत नाही. ज्याच्याकडे जमीन खरेदी करण्यासाठी पुरेसा पैसा आहे व ती जमीन विकसित करण्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी आवश्य असलेले बळ आहे तो सर्वात पात्र बांधकाम व्यावसायिक ठरतो. दुर्दैवाने ग्राहकांनाही या नव्या पिढीतल्या बांधकाम व्यावसायिकांचीच सवय झाली, त्यातल्या अनेकांकडे काही पर्याय नव्हता, तर अनेक जणांनी केवळ पैसे वाचविण्याच्या लोभाने समोर असलेला पर्याय स्वीकारला. मात्र रिअल इस्टेटमध्ये अजूनही काही वेडी माणसे आहेत जी जुन्या पुराण्या पारदर्शक पद्धतीने व्यवसाय करतात व त्यांना ग्राहक म्हणजे देव असल्याचे वाटते! अर्थातच त्यांच्याकडे नव्या युगातल्या बांधकाम व्यावसायिकांशी बरोबरी करण्याची क्षमता नसते. ते सर्व वृत्तपत्रांमध्ये पानभर जाहिराती देऊन ते कसा व्यवसाय करतात किंवा त्यांच्या प्रकल्पाची काय वैशिष्ट्ये आहेत हे सांगू शकत नाहीत. म्हणूनच बहुतेक ग्राहक नव्या विकासकांच्या व त्यांच्या स्वप्नातलं घर देणाऱ्या प्रस्तावांच्या मागे धावत होते. नेमक्या इथेच असामाधानाच्या लाटा रिअल इस्टेटच्या किनाऱ्यावर येऊन पहिल्यांदा आदळल्या.

पानभर जाहिराती छापण्यात किंवा तुमचं उत्पादन विकताना विविध प्रस्ताव देण्यात चूक काहीच नाही मात्र प्रकल्प सुरु करताना व जमीन खरेदी करण्यात झालेली प्रचंड मोठी गुंतवणूक भरून काढताना अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष झालं. कार्पेट व बिल्ड-अप एरियाच्या जागी सुपर बिल्ड अप/चार्जेबल वगैरेसारखे घटक आले व आता अमुक एक रकमेला दोन बीएचके असे सांगितले जाते. यामुळे व्यवहारातली पारदर्शकता पूर्णपणे नाहीशी झाली कारण बहुतेक ग्राहकांना ते त्यांच्या घरांसाठी किती व कसे पैसे देत आहेत हे कधीच समजत नाही. यानंतर आणखी एक शब्द वापरला जाऊ लागला तो म्हणजे प्रिलाँच (प्रकल्प सुरु होण्यापूर्वी बुकींग घेणे), म्हणजे प्रकल्पाची योजना तयार आहे व इतर सर्व मंजुऱ्या मिळायच्या आहेत मात्र तरीही तुम्ही सदनिका आरक्षित करू शकता कारण तुम्हाला हव्या त्या सदनिकेचा पर्याय मिळतो तसेच दरही कमी असतो जो सर्व मंजुऱ्या मिळाल्यानंतर अतिशय जास्त असेल असा दावा केला जातो! त्यानंतर रिअल इस्टेटच्या शब्दकोशात आणखी एक भर पडली ती म्हणजे पायाभूत सुविधांसाठीचे शुल्क; याचा नेमका अर्थ म्हणजे काय हे मी सुद्धा सांगू शकत नाही केवळ अंदाज बांधू शकतो, याचा अर्थ असा होतो की प्रकल्पाचा भाग असलेल्या गोल्फ क्लब, स्पा व जिम या सुविधांसाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. ग्राहकांनीही विचार केला की चांगला व्यवहार आहे व आपल्या स्वप्नातलं घर मिळविण्याची ही शेवटची संधी आहे असा विचार करून त्यांनी आरक्षणाला प्रतिसाद दिला! मात्र हळूहळू हे स्वप्न एक दुःस्वप्न ठरू लागलं कारण प्रकल्प केवळ प्रिलाँच टप्प्यातच राहिला किंवा ताबा देण्याची तारीख इतकी लांबली की ग्राहकांच्या सहनशीलतेचा अंत झाला. प्रिलाँचमध्ये दाखविण्यात आलेला प्रकल्पाचा आराखडा बदलू लागला, जिथे बाग दाखविण्यात आली होती तिथे काँक्रिटाचा आणखी एक टॉवर आला किंवा काही प्रकरणांमध्ये पायाभूत सुविधांचे शुल्क दुप्पट झाले किंवा माहितीपत्रकात दिलेल्या या अनेक सुविधा केवळ सदस्यांसाठीच मर्यादित राहिल्या, घराचे चटई क्षेत्र डिस्नेच्या हनी आय श्रंक द किड्स या चित्रपटासारखे कमी झाले, बांधकामाचा दर्जा इतका सुमार झाला की पहिल्याच पावसात पाणी झिरपल्याने महागड्या अंतर्गत सजावटीचे नुकसान झाले व अशा प्रकारे नाराज होण्याच्या कारणांची यादी वाढतच राहिली! बांधकाम व्यावसायिक कोणत्याही तक्रारींसाठी स्पष्टीकरण द्यायला कधीच उपलब्ध नव्हते, तुम्ही कधीही गेलात तरी तुम्हाला प्रत्येक वेळी कुणी नवीन कर्मचारीच भेटायचा व तो पहातो, करतो, सांगतो यासारखी ठोकळेबाज उत्तरे द्यायचा!

मला असं वाटतं मंजुऱ्या वगैरे मिळविण्याच्या बाबतीत रिअल इस्टेट एकीकडे सर्वात नियंत्रित उद्योग आहे तर दुसरीकडे विक्री दरावर नियंत्रण ठेवण्याचा मुद्दा असेल तर सर्वात अनियंत्रित उद्योग आहे. मात्र कच्च्या मालाचे म्हणजेच जमीनीचे दर, तसेच पोलाद व सिमेंट सारख्या मूलभूत घटकांचे दर अनियंत्रित आहेत! नाराज ग्राहकांच्या दबावामुळे गोंधळलेल्या सरकारने ग्राहकांचे रक्षण करण्यासाठी मोफा (एमओएफए) व नंतर रेरासारख्या (आरईआरए) कायद्याच्या कारवाईचा बडगा उगारला. या सर्व असमाधानाच्या पार्श्वभूमीवर किंवा चुकीच्या धोरणांमुळे, रिअल इस्टेटमध्ये व्हायचा तो परिणाम झाला, मंदी आली! लोकांनी प्रामुख्याने दोन कारणांनी घर खरेदी करायचा निर्णय लांबणीवर टाकायला सुरुवात केली, एक म्हणजे त्यांना त्यांचे उत्पादन कधी ताब्यात मिळेल याची खात्री नाही व दुसरे म्हणजे त्याची किंमत! यातला पहिला भाग अधिक महत्वाचा आहे कारण एखादे उत्पादन कोणत्या दराने विकत घ्यायचे किंवा विकायचे हे प्रत्येक व्यक्तिने ठरवायचे आहे!  म्हणूनच रिअल इस्टेटचे अच्छे दिन परत यावेत असं वाटत असेल तर सर्वप्रथम बांधकाम व्यावसायिकांनी ग्राहकांना जे आश्वासन दिले आहे ते पूर्ण केले पाहिजे. माझ्यावर विश्वास ठेवा बहुतेक ग्राहकांना केवळ एक साधे आश्वासन हवे असते ते म्हणजे त्यांचे घर वेळेत मिळेल! मला असे वाटते की एक बांधकाम व्यावसायिक म्हणून तुम्ही ते करू शकला तर नव्वद टक्के असमाधान कमी होईल! 

आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जे काही विकत आहात ते पारदर्शकपणे करा; म्हणजे चटई क्षेत्रापासून ते विक्रीयोग्य वगैरे बाबी, आता इथे मुद्दा अनुपाताचा नाही मात्र चटईक्षेत्रापासून ते बिल्ट-अपपर्यंत जागेचे तपशील व्यवस्थित नमूद करा. ग्राहक आजकाल हुशार असतात व ते आपल्या पैशांची किंमत जाणतात, म्हणूनच तुम्ही कशासाठी व कसे पैसे आकारताय हे स्पष्टपणे नमूद करा; त्यामुळे कोणतेही छुपे दर आकारण्याऐवजी तर्कशुद्धपणे, नेमकेपणाने बाजू मांडासर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या ग्राहकांसाठी त्यांना जे काही जाणून घ्यायचे आहे त्यासाठी उपलब्ध राहा. तुम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटलेच पाहिजे असे नाही, मात्र तुम्ही तुमचा चमू अशाप्रकारे तयार करा की ते तुमचे योग्यप्रकारे प्रतिनिधित्व करतील केवळ निरोप्याचे काम करणार नाहीत.सर्व कागदपत्रे व्यवस्थित असतील व जे काही आश्वासन दिले आहे ते पूर्ण करणारी यंत्रणा असेल, तर ग्राहक तुम्हाला फक्त धन्यवादच देतील व तेव्हाच रिअल इस्टेटसाठी खऱ्या अर्थाने अच्छे दिन येतील! हे मान्य आहे की कधीतरी कुणीतरी अतृप्त आत्मा असेलच जो तुम्ही कितीही प्रामाणिकपणे प्रयत्न केले तरीही समाधानी होऊ शकणार नाही मात्र तो तुमच्या व्यवसायाचा एक भाग आहे! श्री. गेट्स यांनी असमाधानी ग्राहकांचा शिकण्यासाठी वापर करा असं सांगितलं असलं तरीही आपण सतत फक्त शिकतच राहू शकत नाही हे देखील स्वतःला समजवायला हवं!  
त्याचवेळी ग्राहकांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे त्यांच्या वाट्याला येणारे असामाधान हे एक तर त्यांच्या अज्ञानामुळे असते किंवा केवळ काही पैसे वाचविण्याच्या हव्यासामुळे असते! तुमच्या बांधकाम व्यावसायिकाने तुम्हाला फसवले म्हणून प्रत्येकवेळी आरोप करण्याऐवजी, तुम्ही कोणत्या बांधकाम व्यावसायिकाशी हातमिळविणी करताय याचे थोडे डोळे उघडे ठेवून सर्वेक्षण करणे कधीही चांगले. लक्षात ठेवा बाजारात दोन्ही प्रकारचे बांधकाम व्यावसायिक आहेत, एक चांगले व दुसरे वाईट व तुमचा आनंद हा पूर्ण तुम्ही कुणाशी व्यवहार करताय याच्यावरच अवलंबून असतो


संजय देशपांडे


Mobile: 09822037109