Tuesday 7 March 2017

हिरवी शहरे का हिरवे नागरीक ?



























ज्या झाडांची वाढ थोडी हळु होते त्यांनाच सर्वोत्तम फळे लागतात”… मुलिएर

जेन-बाप्तिस्ट पोकेलीन, यांना रंगमंचावर मुलिएर या नावाने ओळखले जाते. ते फ्रेंच नाटककार व अभिनेते होते ज्यांना पाश्चिमात्य साहित्यात महान विनोदी नाटककार म्हणून ओळखले जाते. ते लोकांना हसवता हसवता कसे विचारप्रवृत्त सुद्धा करत असत याचे उदाहरण वरील अवतरणातून दिसून येते. मी तीन गोष्टींमुळे त्यांचे अवतरण या लेखासाठी वापरले. अनेक जणांना माहिती नसेल की ३ मार्च हा भारतामध्ये वन्य जीवन दिवस म्हणून साजरा केला जातो. सामान्य माणसाला आपल्या भोवतालच्या वन्य जीवनाच्या महत्वाविषयी जागरुक करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. दुसरे म्हणजे माझा वन अधिकारी असलेला मित्र सुनील लिमये यानं मला वन विभाग चिमण्या व इतर काही पक्षांची संख्या वाढवण्यासाठी काय प्रयत्न करता येतील यासाठीच्या उपक्रमात सहभागी करून घेतले. तिसरे म्हणजे या पार्श्वभूमीवर शहरे हिरवी करण्याविषयी वृत्तपत्रातल्या दोन परस्परविरोधी बातम्या माझ्या वाचण्यात आल्या. आता, एखादा असा प्रश्न विचारेल की सुनिलचं आमंत्रण सोडलं तर माझं काम म्हणजे रिअल इस्टेट व वन्य जीवन व हिरव्या शहरांमध्ये काय संबंध आहे. मी असा प्रश्न विचारणाऱ्या बहुतेक लोकांना दोष देत नाही कारण महिन्याला ईएमआयची किंवा आपल्या व्यवसायाच्या उलाढालीची चिंता करताना आपल्याला चिमण्या, वन्यजीवन किंवा आपल्याभोवतीच्या वनराई विषयी विचार करायला फारसा वेळच उरत नाही. मात्र आपलं शहर हिरवं करण्याची, वन्य जीवनाचं तसंच चिमण्यांचं रक्षण करण्याची जबाबदारीही आपल्यापैकी प्रत्येकाची आहे. कारण आपण या तिन्ही बाबींना जोडणारा समान धागा आहोत.

माझा वन्यजीवनप्रेमी मित्र अनुज खरे याने पुण्याचा वन विभाग व पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने वन्य जीवन दिनाच्या निमित्तानं एका कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात नुल्ला मुथ्थू व बेदी ब्रदर्स यासारख्या सुप्रसिद्ध छायाचित्रकारांचे वन्यजीवनाविषयीचे माहितीपट दाखवण्यात आले. मी या वन्य जीवन माहितीपट महोत्सवाच्या उद्घाटनाच्यावेळी बोलताना म्हटलं, की अलिकडे समाजातल्या आर्थिक सुबत्ता असलेल्या वर्गात स्वतःला वन्यजीवप्रेमी म्हणवण्याची फॅशन आलीय. हा वर्ग फक्त महागडे कॅमेरे, अत्याधुनिक साहित्य खरेदी करतो, व्याघ्र अभयारण्यांना भेटी देतो, सुंदर छायाचित्रे काढतो, फेसबुक व वॉट्स-ऍप ग्रूपवर टाकतो, त्याला किती लाईक्स मिळाले हे मोजतो आणि आपण वन्यजीवप्रेमी असल्याचे बिरुद मिरवतोअर्थात काहीच न करण्यापेक्षा हे बरं आहे, मात्र वन्यजीवन अनुभवणे म्हणजे फक्त व्याघ्र अभयारण्यांना भेट देऊन छायाचित्रं काढणं एवढाच अर्थ होतो का हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आपल्या सगळ्यांवरच वन्यजीवनाचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे व म्हणूनच आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की मी हे कशासाठी करतोय? आपण वन्यजीवन माहितीपट उत्सवाला येतो, हे वन्य जीवनाचे अतिशय सुंदर चित्रण असलेले चित्रपट पाहतो ज्यासाठी काही लोकांनी त्यांचं पूर्ण आयुष्य समर्पित केलेलं असतं, छायाचित्रकाराच्या कामासाठी टाळ्या वाजवतो, अनुजसारख्या स्वयंसेवी संस्थांचे तसेच वनविभागाचे आभार मानतो व घरी जातो. मी म्हणेन की हे पुरेसं आहे का हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजेया महोत्सवात दाखवण्यात आलेल्या माहितीपटांपैकी एक पश्चिम घाटांविषयी होता. पुण्यातल्या किती नागरिकांना ते पश्चिम घाटाचाच एक भाग आहेत व त्याच्या विनाशास कारणीभूत आहेत हे माहिती आहे? अनेक जणांना हे ऐकून धक्का बसेल व आम्ही पश्चिम घाटाच्या विनाशाला कसे कारणीभूत आहोत असा प्रश्न ते विचारतील? आपल्यापैकी अनेकजण अशा इमारतींमध्ये राहतात (मी स्वतः एक बांधकाम व्यावसायिक आहे हे विसरत नाही) ज्या झाडांना तोडून बांधण्यात आल्या आहेत. आपल्याला घरं हवी आहेत हे मान्य आहे, त्यासाठी आपण पश्चिम घाटाच्या जैवविविधतेचा भाग असलेली झाडं तोडत असलो तरीही हे नुकसान भरून काढण्यासाठी मी काय केले आहे, हा प्रश्न मला तुमच्यापैकी प्रत्येकाला विचारायचा आहे. घरे आवश्यक आहेत पण ती कशा प्रकारे बांधल्या जातात हे पण पाहणे तितकेच आवश्यक आहे.

त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे चिमण्या तसंत बुलबुल, मैना यासारख्या नामशेष होत चाललेल्या पक्षांची संख्या वाढवण्यासाठी वन विभाग करत असलेल्या प्रयत्नाचा. पुण्यात काही वर्षांपूर्वीपर्यंत बुलबुल, मैना हे पक्षी अगदी सहजपणे दिसायचे, जे आता दिसत नाहीतसुदैवाने वनविभागाला आपली जबाबदारी फक्त जंगलाच्या सीमेपुरतीच मर्यादित नाही तर शहरांमध्ये त्याची जास्त गरज आहे हे जाणवलं. आपण आपल्या जगण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वनजमीनींवर ताबा मिळवला असेल तर शहरांमध्येच त्या जंगलांची पुननिर्मिती करणं हाच एक उपाय आहे. असं झालं तरच आपण शहरातून बाहेर घालवलेले चिमण्यांसारखे पक्षी पुन्हा शहरात येतील व हे आपोआप होणार नाही. त्यासाठी चिमण्यांना शहरांमध्ये जगण्यासाठी काय आवश्यक असतं हे कळलं पाहिजे व त्यांना ते दिलं पाहिजे व लवकरात लवकर दिलं पाहिजे. मुख्य म्हणजे आपल्याला जेव्हा वाघ किंवा चिमण्या अशा कोणत्याही प्रजातीचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा ते ज्या जीवन चक्राचा भाग आहेत त्याची पूर्णपणे निर्मिती केल्याशिवाय हे शक्य होणार नाही. म्हणजे आपल्याला चिमण्या शहरात पुन्हा याव्यात असं वाटत असेल तर आपण त्यांना त्यांची जागा म्हणजे झाडे, झुडुपे, गवत व धूळ उपलब्ध करून दिली पाहिजे तिथे ते त्यांचे घरटे बांधू शकतील, आपले पंख धुळीत कोरडे करू शकतील. त्यानंतर आपण त्यांचे अन्न चक्र तयार करावे लागेल, म्हणजेच फक्त एका वाडग्यात धान्य ठेवून चालणार नाही तर, तर त्यांना किडे, कीटक तसंच पाणी वर्षभर उपलब्ध झालं पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्याला चिमण्यांना वायू तसंच ध्वनी प्रदूषणापासून सुरक्षित ठेवावं लागेल व त्यांना एकांत द्यावा लागेल जिथे त्या अंडी घालू शकतील व त्यांची संख्या वाढू शकेल. असं केलं तरंच चिमण्या, बुलबुल व मैना परत आपल्यात येतील व त्यांच्या किलबिलाटानं आपल्या जीवनात पुन्हा चैतन्य येईल! आपल्याला हे अतिशय वेगानं करावं लागेल, कारण आपण या पक्षांचं घर असलेली माती, झाडे, गवत व नैसर्गिक जलस्रोतांवरच धडाक्यानं काचेची व काँक्रीटची घरे व कार्यालये बांधत आहोत.

तिसरी बाब म्हणजे राज्य सरकारच्या हरित शहरे बनविण्याविषयीच्या मोहिमेची बातमी. ही मोहीम केंद्र सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या योजनेत अमृत वर्गवारीत येणाऱ्या ४३ शहरांमध्ये राबवली जाणार आहेत. ज्यांना अमृत योजना काय आहे हे माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो, महानगरांसाठी ज्याप्रमाणे स्मार्ट सिटी प्रकल्प आहे त्याचप्रमाणे एक ते तीन लाख लोकसंख्येच्या शहरांसाठी ही योजना आहे. या शहरात भविष्यात स्थलांतर होण्याची क्षमता आहे व आत्तापासूनच आपण या स्थलांतरितांना सामावून घेण्यासाठी तयारी केली तर आपण मुंबई व पुणे या महानगरांमध्ये निसर्गाचे नुकसान करण्याची जी चूक केली ती टाळता येईल. या योजनेअंतर्गत सर्व शहरांमध्ये हरित उद्याने असतील जी शहरासाठी ऑक्सिजन सिलेंडरचे काम करतील. ही कल्पना अतिशय उत्तम आहे, मात्र अशी ठिकाणी शोधणे, त्यासाठी जागा अधिग्रहित करणे व कोणतेही अतिक्रमण न होता झाडे जगवणे अशी अनेक आव्हाने आहेत. प्रशासनाकडे सगळ्याप्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध असूनही, अशा हरित पट्ट्यांचे व जैव विविधता उद्यानांचे पुण्यासारख्या शहरात काय होते हे आपण पाहिले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले नाईक बेट जे पक्षी उद्यान म्हणून विकसित करणे अपेक्षित होते. मात्र सध्या अशी परिस्थिती आहे की पुणे महानगरपालिका किंवा वनविभाग दोन्हीही त्याच्या देखभालीची जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. इथे कचरा फेकला जातो तसंच मोठ्या प्रमाणे अतिक्रमणे झाली आहेत व सगळे अवैध उद्योग चालतात. पुण्यासारख्या तथाकथित जागरुक शहरात अशी परिस्थिती असेल लहान शहरांचं काय असा प्रश्न आपण विचारला पाहिजे. याचा खात्रीशीर मार्ग म्हणजे महापालिकेला त्याची जबाबदारी द्यावी व गरज असेल त्याप्रमाणे दंड करण्याचा किंवा भरपाई देण्याचा अधिकार द्यावाकुणीही जमीनमालक त्याला पूर्ण भरपाई मिळाल्याशिवाय आपली जमीन वृक्ष लागवडीसाठी किंवा हरित उद्यानांसाठी देणार नाही, भरपाई मिळूनही तो देईलच अशी खात्री नाही. म्हणूनच हरित उद्याने शहरासाठी आवश्यक सेवा असल्याचे ठरवा व स्थानिक प्रशासकीय संस्थेला सक्तिने जमीन अधिग्रहित करण्याचा अधिकार द्या, त्यांनी हे काम केले नाही तर त्यांचा निधी बंद करा. वेळोवेळी वृक्ष लागवडीची काय परिस्थिती आहे हे तपासावृक्ष लागवडीसाठी शहरातील सर्व नागरिक जबाबदार असल्याची जाणीव करून द्या. मी इथे आमच्या बांधकामांच्या ठिकाणी आम्ही केलेली सोपी उपाययोजना सांगतो. पुण्यामध्ये कुठल्याही प्रकल्पासाठी भोगवटा प्रमाणपत्र मिळविण्यासाठी उद्यान विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते ज्यासाठी प्रत्येक ८० चौरस मीटर भूखंडावर एक झाड लावणे सक्तिचे आहे. बहुतेक बांधकाम व्यावसायिक वृक्ष लागवडीच्या नियमांचे पालन करत असले तरी त्यातली किती जगतात याची काळजी विशेष कुणीही करत नाही. याचे कारण म्हणजे इमारतीचा ताबा रहिवाशांना दिल्यानंतर बांधकाम व्यावसायिकाचे झाडे वाढवण्यावर काहीही नियंत्रण राहात नाही. बांधकाम व्यावसायिकाला उद्यान विभागाककडे २५,०००/- रुपयांची रक्कम जमा करावी लागते व झाडे जगली आहेत तसेच चांगली वाढली आहेत याची खात्री केल्यानंतरच ती परत मिळते. ही रक्कम प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या तुलनेत नगण्य असल्यामुळे ती परत घेण्याची तसदी कुणी घेत नाही व परिणामी नव्याने लावलेल्या झाडांपैकी अतिशय कमी झाडे जगतात. विनोद म्हणजे पुण्याच्या उद्यान विभागाकडे गेल्या पाच वर्षात नवीन प्रकल्पांमध्ये नेमकी किती झाडे लावण्यात आली व त्यातली किती जगली याची कोणतीही आकडेवारी नाही. हे पुण्यासारख्या शहरात होतंय जिथे महानगरपालिका पन्नासहून अधिक वर्षांपासून अस्तित्वात आहे आता लोकांना झाडं किती महत्वाची आहेत याची कितपत जाणीव आहे पहा! आणि विचार करा लहान शहरांमध्ये काय परिस्थिती असेल. आम्ही आमच्या प्रकल्पांमध्ये आमच्या सदनिकाधारकांकडूनच वृक्षारोपण करून घेतलं व प्रत्येक झाडापाशी त्यांचं नाव लावलं. आम्ही सदनिकाधारकांना शपथ दिली की त्यांनी संबंधित झाड दत्तक घेतलं आहे व ते जिवंत राहील याची खात्री करतील व आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्याची काळजी घेतील. सदनिकाधारकांचे नाव झाडाला दिल्यामुळे तो त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनतो. माझे नाव असलेले झाड वाळले व माझ्या शेजाऱ्याचे टिकले तर ते सगळेजण पाहतील. सदस्य आपल्या सामाजिक प्रतिमेच्या भीतीने झाडाची काळजी घेतील असा विचार आम्ही केला. ही कल्पना इतकी यशस्वी ठरली की आम्ही पूर्ण केलेल्या प्रकल्पांमध्ये झाडे जगण्याचे प्रमाण जवळपास ९०% आहे. मला असे वाटते आपण जेव्हा असे म्हणतो की आपण आपली शहरे हिरवी बनवली पाहिजेत, तेव्हा सर्वप्रथम आपण नागरिकांना हिरवा विचार करायला शिकवलं पाहिजे; याचे कारण म्हणजे केवळ हरित धोरणे व स्थानिक कायदे करून हे साध्य होणार नाही तर हिरवा विचार करणारे नागरिकच हिरवे शहर तयार करू शकतात व ते हिरवे ठेवू शकतात. आपल्याकडे महानगरपालिका किंवा नगर परिषदेच्या पातळीवर मुहल्ला समित्या असतात त्याप्रमाणे आपण हरित समित्या तयार करू शकतोत्याचप्रमाणे आपण प्रभाग पातळीवर, जास्तीत जास्त वृक्षारोपणासाठी तसेच परिसर हिरवा करण्यासाठी नागरिकांच्या वैयक्तिक प्रयत्नांसाठी हरित नागरिक पुरस्कार देण्याचा विचार करू शकतो.

त्यानंतर या हरित पार्श्वभूमीवर मी कुप्रसिद्ध वृक्ष कायद्यात बदल करण्यात आल्याची बातमी वाचली. मी कुप्रसिद्ध हा शब्द वापरला कारण बांधकाम व्यावसायिक किंवा स्वयंसेवी संस्था कुणालाच तो आवडायचा नाही. शहरातील वृक्ष तोड व या कायद्यांतर्गत त्याची प्रक्रिया ही मुख्य समस्या आहेमी नेहमी असं म्हणतो की असे कायदे तयार करून नका ज्याचा मूळ उद्देशच लोक धाब्यावर बसवतील. वृक्ष कायदा हे त्याचे उत्तम उदाहरण आहे, हा कायदा अतिशय जुना पुराणा आहे व आजच्या समस्या सोडवण्यासाठी तो योग्य नाही. एखाद्या बंगल्यात एखाद्या आजोबांनी लावलेलं म्हातारं झाड पडायला आलं असेल, तर त्या बंगल्याच्या मालकाला ते तोडण्यासाठी इतकी त्रासदायक प्रक्रिया पार पाडावी लागते की तो त्याच्या शत्रू होतो. गृहनिर्माण संस्थांमध्येही अशीच परिस्थिती असते, परिणामी नंतर त्रास होऊ नये म्हणून लोक मोठी झाडे लावत नाहीत. नेहमीप्रमाणे जे कायद्याचे पालन करतात किंवा आदर करतात त्यांच्यासाठीच ते असतात, त्यामुळे वृक्ष कायदा असूनही शहरातली वृक्ष तोड थांबलेली नाही हे तथ्य आहे. या कायद्यातील पळवाटांचा किंवा वृक्ष कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत अधिकाऱ्यांच्या उदासीनतेचा फायदा घेऊन दररोज शेकडो वृक्ष तोडले जातात. तसेच या कायद्यांतर्गत वृक्ष प्राधिकरण असले पाहिजे जे प्रत्येक वृक्ष तोडण्याला परवानगी देईल. ज्यांनी वृक्ष तोडण्याची परवानगी घेण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाला कधी संपर्क केला असेल त्यांना हे वृक्ष प्राधिकरण कसे काम करायचे हे माहिती असेल. आता नवीन कायद्यामुळे वृक्ष प्राधिकरण बरखास्त करण्यात आले आहे व संबंधित वृक्ष अधिकारी वृक्ष तोडीचा प्रस्ताव किती प्रामाणिक आहे याचे विश्लेषण करून वृक्ष तोडीच्या विनंतीला परवानगी देईल. पंचवीसहून अधिक वृक्ष तोडायचे असल्यास माननीय महापालिका आयुक्तांना कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणेनुसार निर्णय घेण्याचा अधिकार आहे, त्यामुळे हा कायदा बांधकाम व्यावसायिकांसाठी सौम्य करण्यात आल्याचे स्वयंसेवी संस्थांना वाटते. मला असं वाटतं की, कोणताही कायदा किती कडक किंवा किती सौम्य आहे यावरून नाही तर सामान्य माणसाचा किंवा प्राधिकरणांचा कायद्याविषयीचा दृष्टिकोन कसा आहे यानुसार कायद्याची परिणामकारकता ठरत असते. वृक्ष कायदाही याला अपवाद नव्हता. कायदा आधी कडक होता त्यामुळे काय चमत्कार झाला असा प्रश्न आपण विचारला पाहिजे व आपण झाडं कशी जगवायची यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.

अशाप्रकारे वन्य जीवन, चिमण्या संवर्धन कार्यक्रम व हरित उद्यानांची बातमी रिअल इस्टेटशी तसंच शहराशी निगडित आहे. आपल्या पुढील पिढ्यांना चांगलं भविष्य देण्यासाठी आपल्याला आपली शहरं हिरवी हवी आहेत. त्याचसोबत त्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी चिमण्या, तसंच अगदी वाघ, त्यांच्यासाठी सुरक्षित वसतिस्थान आवश्यक आहे. या जीवनचक्रात जंगल, नागरिक विकास, स्थानिक प्रशासकीय संस्था व सर्वात महत्वाचे म्हणजे नागरिकांनी समतोल राखला, एकजुटीने काम केले तरच झाडे, चिमण्या व वाघांसाठी काही आशा आहे. शेवटी रिअल इस्टेट म्हणजे मानवी वसतिस्थान व त्या ठिकाणी पक्षांचा किलबिलाट असेल, स्वच्छ हवा असेल  व सगळीकडे हिरवळ असेल त्याहून चांगले पर्यावरण काय असू शकते. म्हणून जंगलांवर अतिक्रम न करण्याचा व प्राण्यांना त्यांची हक्काची जागा देण्याचा निर्धार करू, तरंच वाघ त्यांच्या वसतिस्थानी सुरक्षित व आनंदी राहू शकता. आपणही आपल्या ठिकाणी शांततेत राहू शकू, ज्यामुळे जीवनाचा अचूक समतोल साधला जाईल. वेळ अतिशय कमी आहे, शेकडो वर्ष जुने झाड तोडण्यासाठी केवळ काही मिनिटे लागतात किंवा चिमण्यांसारखे पक्षी एखाद्या विशिष्ट ठिकाणाहून नामशेष होण्यासाठी केवळ काही वर्ष लागतात. मात्र मुलिएर यांनी म्हटल्याप्रमाणे एखाद्या झाडाला सर्वोत्तम फलधारणा होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. आपण आत्ताच झाडे लावली नाहीत तर भविष्यात आपल्या नशीबी फक्त काळवंडलेली व कडवट फळेच असतील व त्याला फक्त आपणच जबाबदार असु !

संजय देशपांडे


Mobile: 09822037109


No comments:

Post a Comment